AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्ही मते दिली म्हणजे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का?’; अजित पवार भर मंचावर संतापले

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत एका कार्यक्रमात चांगलेच संतापले. त्यांचं भाषण सुरु असताना काही कार्यकर्ते आणि नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला. यानंतर संतापलेले अजित पवार यांनी 'तुम्ही मते दिली म्हणजे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का?', असं वक्तव्य केलं.

'तुम्ही मते दिली म्हणजे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का?'; अजित पवार भर मंचावर संतापले
अजित पवार
| Updated on: Jan 06, 2025 | 4:13 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भर मंचावर आपल्या कार्यकर्त्यांवर संतापले. “तुम्ही मते दिली म्हणते मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?” असा सवाल अजित पवारांनी केलाय. बारामतीमधील एका कार्यक्रमात अजित पवार चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार इतके का संतापले? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जातोय. अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते बारामतीत विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. या दरम्यान मेधा येथे पेट्रोल पंपच्या उद्घाटनावेळी अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर नागरिक त्यांना निवेदन देण्यासाठी पुढे जात होते.

नागरिकांचे निवेदन स्वीकारत असताना अजित पवार हे अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याचे निर्देश देत होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याने अनेक कामे रखल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या तक्रारीत हो ला हो मिळवलं. या घडामोडींमुळेच मंचावर नागरिकांसोबत संवाद साधत असलेले अजित पवार संतापले. त्यांनी रागात संबंधित वक्तव्य केलं.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“अरे तुम्ही ना, तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलं का? मला सालगडी केलं का?”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही आता व्हायरल होत आहे. त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सगळं त्यांचं आहे. लोकांना उपाशी ठेवायचे ते ठरवतील. माझं मत आहे की, मला लोकांनी मतं दिली तर मी त्यांचा सालगडी आहे. एवढे दिवस सत्ता तुम्हाला मतदारामुळे मिळाली. हा मतदारांचा अपमान आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.