AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; काँग्रेसने रोखली सेनेची एक कोटींची कामे

शिवसेनेच्या जिल्हापरिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून जिल्हापरिषदेतील काँग्रेस आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. पदाधिकारी बदलासाठी राजीनामा द्यायला तयार नसलेल्या शिवसेनेच्या बांधकाम सभापीतींची कामे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी रोखली आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; काँग्रेसने रोखली सेनेची एक कोटींची कामे
कोल्हापूर जिल्हा परिषद
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 10:54 AM
Share

कोल्हापूर: शिवसेनेच्या जिल्हापरिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून कोल्हापूर जिल्हापरिषदेतील काँग्रेस आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. पदाधिकारी बदलासाठी राजीनामा द्यायला तयार नसलेल्या शिवसेनेच्या बांधकाम सभापीतींची कामे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी रोखली आहेत. तब्बल एक कोटींची कामे रोखली आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले असून आता हा वाद मातोश्री दरबारी गेला आहे. (dispute between shiv sena and congress in kolhapur jilha parishad)

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाला वेगळं वळण लागलं आहे. पदाधिकारी बदलासाठी राजीनामा द्यायला तयार नसलेल्या शिवेसनेचे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी मंजूर केलेली एक कोटींची कामे जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी रोखली आहेत. ही कामे रोखण्यासाठी बजरंग पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्रंही दिले आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे.

वाद मातोश्री दरबारी

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. मात्र, पदाधिकारी बदलाची वेळ आल्याने शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास चालढकल सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला असून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीतील संबंध ताणले गेले आहेत. शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा म्हणून काँग्रेसने आता थेट मातोश्रीवरून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मातोश्रीतून काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (dispute between shiv sena and congress in kolhapur jilha parishad)

संबंधित बातम्या:

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक, महाविकास आघाडी एकत्र, भाजप सत्ता गमावणार?

‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ मनसेचा मुंबईच्या महापौरांवर निशाणा

‘तुम्ही काही केलंच नाही तर झोंबतं कशाला?’, चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात शाब्दिक चकमक

(dispute between shiv sena and congress in kolhapur jilha parishad)

Follow Us
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य