AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘2000च्या नोटा बंद करणं चूक, अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार’, अर्थतज्ज्ञांचा इशारा

"यात एक राजकीय शक्यता देखील असू शकते. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. 2016 मध्ये झालेल्या नोटबंदी नंतर लगेच उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत्या. त्यावेळी इतर पक्षाकडे असलेला पैसा वापरता येऊ नये म्हणून नोटबंदी करण्यात आली होती", असा दावा अर्थतज्ज्ञ अजित अभ्यंकर यांनी केला.

'2000च्या नोटा बंद करणं चूक, अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार', अर्थतज्ज्ञांचा इशारा
| Edited By: Chetan Patil | Updated on: May 19, 2023 | 9:12 PM
Share

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2 हजाराच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशांनुसार, देशातील सर्वसामान्यांना 23 मे ते 20 सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत आपल्याकडे असलेल्या 2 हजाराच्या नोटा बँकेत जमा किंवा बदलून घ्यावं लागणार आहे. अर्थात तो पर्यंत दोन हजाराच्या नोटा या चलनात असतील आणि व्यवहारही होऊ शकतील, असं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आरबीआयच्या या निर्णयावरुन अर्थतज्ज्ञ अजित अभ्यंकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचं अजित अभ्यंकर म्हणाले आहेत.

“मागच्या नोटबंदीचा विचार करता आजचा निर्णय म्हणजे अर्थव्यवस्थेला सणसणीत धक्का आहे. या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. नोटबंदीने काळा पैसा बाहेर येईल हा भ्रम आहे. याआधी लाखो कोटी बँकेत जमा झाले. पण त्यावर सरकारने काहीही ॲक्शन घेतली नाही. पहिल्या नोटबंदीचा काय फायदा झाला? मुळात 2000च्या नोटा चलनात आणणे हीच पहिली चूक होती आणि त्या बंद करणे ही दुसरी चूक ठरणार आहे”, असा दावा अजित अभ्यंकर यांनी केला आहे.

“या निर्णयाने चलनात असलेलं 13% चलन आता बंद होणार आहे. याला पर्याय काय हे अजून माहिती नाही. केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. याची उद्दिष्ट देशासाठी चांगली नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका भविष्यात बसेल. या निर्णयाबद्दल भीती नसून मोठा संशय आहे. बाजारात नोटांचा मोठा स्लॅक येईल. बाजारावरती आणि रोजगारावरती याचा परिणाम होईल. सरकारने हा निर्णय आपल्या डोक्यावरती लादला आहे. तो स्वीकारलाच पाहिजे”, असं अजित अभ्यंकर म्हणाले.

या निर्णयाची कारणे नेमकी काय असू शकतात?

“मागच्या वेळीची कारणे सरकार देऊ शकत नाही. कारण त्यातलं एकही कारण सिद्ध झालं नाही. दोन हजाराच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या. पण त्याचा हिशेब आरबीआयकडे नसेल हे देखील एक मोठं कारण असू शकतं”, असं अजित अभ्यंकर म्हणाले.

“यात एक राजकीय शक्यता देखील असू शकते. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. 2016 मध्ये झालेल्या नोटबंदी नंतर लगेच उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत्या. त्यावेळी इतर पक्षाकडे असलेला पैसा वापरता येऊ नये म्हणून नोटबंदी करण्यात आली होती. याही वेळेस तसेच काहीतरी कारण असू शकतं”, असा दावा अजित अभ्यंकर यांनी केला.

“RBI ही सरकारच्या ताटाखालची मांजर आहे. सरकार जे म्हणतो तेच आरबीआय करतं. या आधीच्या नोटबंदीवेळी तर सरकारने आरबीआयला विचारलं देखील नव्हतं”, अशी टीका अजित अभ्यंकर यांनी केली.

Follow Us
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....