AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात लग्न होते, कार्यक्रम आटोपवल्यावर दोन कुटुंब लोणावळ्यात आले अन् पाच जण वाहून गेल्यावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Lonavala Bhushi Dam:अन्सारी आणि खान कुटुंबियांकडे २७ जून रोजी लग्न होते. त्यानंतर दोन दिवसानंतर वलिमाचा (लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम) कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम २९ तारखेला झाला. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी ३० तारखेला या कुटुंबियाने लोणावळ्यात जाण्याचा निर्णय घेतला.

घरात लग्न होते, कार्यक्रम आटोपवल्यावर दोन कुटुंब लोणावळ्यात आले अन् पाच जण वाहून गेल्यावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर
लोणावळा धबधबा अपघात
| Updated on: Jul 01, 2024 | 11:24 AM
Share

Lonavala Bhushi Dam: पुणे शहरातील अन्सारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. चार दिवसांपूर्वीच या कुटुंबाकडे लग्न होते. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी लोणावळ्यात जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. भुशी डॅम्पच्या ठिकाणी वर्षाविहारचा आनंद ते घेत होते. परंतु पुढे काळाने त्यांच्यासमोर काय लिहिले आहे? हे त्यांनाही माहीत नव्हते. एका दिवसात घरातील आनंदाच्या वातावरणाचा रुपांतर दु:खात झाले. कुटुंबातील पाच जण सर्वांना सोडून गेले. नेमके काय घडले, हे त्यांच्या नातेवाईकांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला सांगितले.

काय आणि कसे घडले

अन्सारी आणि खान कुटुंबियांकडे २७ जून रोजी लग्न होते. त्यानंतर दोन दिवसानंतर वलिमाचा (लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम) कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम २९ तारखेला झाला. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी ३० तारखेला या कुटुंबियाने लोणावळ्यात जाण्याचा निर्णय घेतला. सकाळीच ते एका टेम्पो ट्रॅव्हलने निघाले. लोणावळ्यात १२ वाजता पोहचले. एकूण १७ जण लोणावळ्यात आले होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर दुपारी दोन वाजता भावाचा फोन आला. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याची मुलगी वाहून गेली. त्याच्या फोननंतर मी तातडीने निघालो आणि लोणावळ्यात आलो. अनिद अन्सारी यांच्या भावाने ‘टीव्ही ९ मराठी’ला सांगितले.

काय घडली होती घटना

पुण्यातील लोणावळ्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. वाहून गेलेल्यामध्ये चार जणांचे मृतदेह सापडले आहे. त्यातील एक मृतदेह शोधण्याचे काम अजूनही सुरुच आहे. साहिस्ता लियाकत अन्सारी (वय- 36), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 13), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 8) अदनान अन्सारी (वय- 4), मारिया अन्सारी (वय- 9) हे पाच जण वाहून गेले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, प्रांत सुरेंद्र नवले, नायब तहसीलदार गणेश तळेकर, लोणावळा मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.