AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोहणे शिकायला भिमा नदीच्या पात्रात सात मित्र उतरले, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांच्या जीवावर बेतले

गौरव हा पाण्यात पोहणे शिकत होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी अनुराग गेला. मात्र त्याला घट्ट पकडल्याने दोघेही बुडाले.

पोहणे शिकायला भिमा नदीच्या पात्रात सात मित्र उतरले, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांच्या जीवावर बेतले
| Updated on: May 22, 2023 | 5:26 PM
Share

सुनील थिगळे, प्रतिनिधी, पुणे : उन्हाळ्याचे दिवस आहेत. सूर्यनारायण चांगलाच कोपत आहे. गारवा मिळण्यासाठी पाण्यात बुडावेसे वाटते. पण, नदीत आंघोळ करण्याची मजा काही औरचं. त्यामुळे नदीत जाऊन पाण्यात पोहण्याचा आनंद काही जण घेत असतात. पण, ज्यांना पोहता येत नाही, अशांची अडचण होते. अशा दोन दुर्घटना समोर आल्या आहेत. कोरेगाव भिमा नदीपात्रात दहावीत शिकणारे दोन मुलं बुडून मरण पावले. तर दुसऱ्या एका घटनेत सुमारे १७ वर्षे वयोगटातील दोन मित्र पाण्यात बुडाले.

पोहणे शिकण्यासाठी गेले ते शेवटचेच

नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सात विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील भीमा नदी पात्रात घडली आहे. यामध्ये गौरव स्वामी आणि अनुराग मांदळे या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ते दहाव्या वर्गात शिकत होते. तब्बल 24 तासानंतर त्यांचे मृतदेह सापडले.

गौरव हा पाण्यात पोहणे शिकत होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी अनुराग गेला. मात्र त्याला घट्ट पकडल्याने दोघेही बुडाले. यात दोघांचाही मृत्यू झाला.

तापी नादीत बुडून दोघांचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, भुसावळ येथील तापी नदीत सतरा वर्षीय दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वाढत्या तापमानामुळे सायंकाळी मित्रांसमवेत नदीत होण्यासाठी गेलेल्या दानिश शेख आणि अंकुश ठाकूर या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दोघांचेही मृतदेहच सापडले. दोन्ही मुलांचे अंदाजे वय 17 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही जण भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील रहिवासी आहेत.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.