AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update | येत्या २४ तासांत मुसळधार, हवामान विभागाने कुठे दिला ऑरेंज अलर्ट

monsoon rain update | सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवशीही राज्यात चांगला पाऊस होणार आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान विभागाने काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Rain Update | येत्या २४ तासांत मुसळधार, हवामान विभागाने कुठे दिला ऑरेंज अलर्ट
| Updated on: Sep 30, 2023 | 12:13 PM
Share

पुणे | 30 सप्टेंबर 2023 : राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. आज पावसाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या महिन्यात राज्यात सर्वच भागांत चांगला पाऊस झाला. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढला. अनेक शहरांचा पाणी प्रश्न मिटला तसेच रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शनिवारी पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडणार आहे.

कुठे पडणार मुसळधार पाऊस

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गोव्यापासून कोकण किनारपट्टीपर्यंत हवामान विभागाने आँरेज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांच्या अनेक बोटी बंदरातच असल्याने त्यांच्यापुढे संकट निर्माण झाले आहे. येत्या २४ तासांत चक्रीवादळाची परिस्थिती वाढणार आहे. बदललेल्या परिस्थितीमुळे सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने सरासरी गाठली आहे.

राज्यात कुठे दिला अलर्ट

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर राज्यातील इतर भागांत मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कुठेही अलर्ट दिला नाही. राज्यातील उर्वरित भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.  दोन दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागांत पावसाचा अलर्ट दिला आहे.

नाशिक जिल्ह्यांत मुसळधार

नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरण शिवारात शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी सांजेगाव ते कावनई या दोन गावांमध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी चक्रीवादळासारखी वावटळ धरणात फिरताना दिसत होती. त्यावेळी धरणाचे पाणी आकाशात उडत होते. स्थानिक गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य कैद केली आहेत.  तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांचा जलसाठाही वाढला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...