AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

lokmanya tilak award : लोकमान्य टिळक पुरस्काराने आतापर्यंत कोणाचा झालाय गौरव

PM Modi Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आतापर्यंत ४० जणांना हा पुरस्कार देण्यात आता. नरेंद्र मोदी यांना ४१ हा पुरस्कार मिळाला आहे.

lokmanya tilak award : लोकमान्य टिळक पुरस्काराने आतापर्यंत कोणाचा झालाय गौरव
lokmanya tilak and narendra modi
| Updated on: Aug 01, 2023 | 12:35 PM
Share

पुणे | 1 ऑगस्ट 2023 : ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देश, विदेशात भारताची प्रतिमा उंचवलेली आहे. तसेच आत्मनिर्भर भारत योजना राबवून त्यांनी देशाला स्वावलंबी केले. यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष जयंत टिळक यांनी दिली. यापूर्वी ४० जणांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरव केला गेला आहे.

कधी सुरु झाला पुरस्कार

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात १ ऑगस्ट १९८३ मध्ये झाली. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार देण्यात येतो. पहिला पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना दिला गेला. आतापर्यंत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi), डॉ मनमोहन सिंग (Dr Manmohan Singh), अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनाही हा पुरस्कार दिला गेला आहे. तसेच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) आणि शंकर दयाळ शर्मा यांचाही हा पुसस्कार देऊन गौरव केला गेला आहे. माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना हा पुरस्कार दिला आहे. खान अब्दुल गफार खान यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यासोबत डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांनाही हा पुरस्कार दिला आहे.

हे ठरले मानकरी

प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांनी केलेल्या हरित क्रांतीमुळे तर दुग्ध क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांना मिळाला आहे. रेल्वे मॅन डॉ. ई. श्रीधरन यांचाही या पुरस्कारने गौरव झाला आहे. संगणक क्षेत्रात केलेल्या कमगिरीमुळे डॉ. विजय भटकर, सॅम पित्रोदा यांचा गौरव झाला आहे. उद्योगात राहुल बजाज, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. सायरस पूनावाला, बाबा कल्याणी यांनी बजावलेल्या कामगिरीचा गौरव केला.

आणखी कोण आहेत मानकरी

शरद पवार, डॉ. आर. चिदम्बरम यांचाही या पुरस्कारने गौरव झाला आहे. त्याचबरोबर गोदावरी परुळेकर, श्रीपाद अमृत डांगे, अच्युतराव पटवर्धन, सुधाताई जोशी, मधु लिमये, बाळासाहेब देवरस, डॉ. रा. ना. दांडेकर, रामोजी राव, जी. माधवन नायर, डॉ. ए. सिवाथानू पिल्लई, मॉन्टेकसिंग अहलुवालिया, प्रणब मुखर्जी, शीला दीक्षित, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. अविनाश चंदेर, सुबय्या अरुणन, शरद पवार, आचार्य बाळकृष्ण, डॉ. के. सिवन, , सोनम वांगचूक, आणि डॉ. टेस्सी थॉमस यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.

थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान.
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान.
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका.
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला.
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;.
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?.
महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?
महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?.
धक्कादायक! गटारीच्या पाण्याने धुतली फळं; वसई-विरारमधला व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! गटारीच्या पाण्याने धुतली फळं; वसई-विरारमधला व्हिडीओ व्हायरल.
कांद्याचे दर कोसळले, कवडीमोल भावाने शेतकरी संतापले
कांद्याचे दर कोसळले, कवडीमोल भावाने शेतकरी संतापले.