AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पळून जाऊन लग्न करण्याचे फॅड, विवाहित महिलांनीही थाटला दुसरा संसार

Pune News | पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये लग्नसंदर्भात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीमुळे पालकवर्गात चिंता निर्माण झाली आहे. भोर तालुक्यात पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.

पळून जाऊन लग्न करण्याचे फॅड, विवाहित महिलांनीही थाटला दुसरा संसार
| Updated on: Jan 02, 2024 | 2:22 PM
Share

विनय जगताप, भोर, पुणे, दि. 2 जानेवारी 2024 | भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हटले जाते. लग्नासाठी शास्त्रोक्त पद्धत भारतीय परंपरेत आहे. परंतु काळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. कॉलेज किंवा इतर ठिकाणी ‘नजरे से नरज मिली’ असे होऊन प्रेम झाले अन् नंतर लग्न झाले, असे होत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. भोर तालुक्यात पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पद्धतीने लग्न करण्यात विवाहित महिलाही आहे. प्रेम प्रकरणाच्या वाढलेल्या या प्रकारामुळे पालक वर्ग चिंतेत आहे.

विवाहित महिलांनी थाटला दुसरा संसार

पुण्याच्या भोर तालुक्यातल्या राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वर्षभरात 55 जणांनी पलायन केल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात 17 तरुण आहेत. त्यात विवाहित महिलांचा समावेश आहे. तरुण मुलींसह 41 महिला पळून गेल्या आहेत. तालुक्यातील प्रेमवीरांच्या या घटनांमुळे पालकवर्ग चिंतेत आहे. गेल्या वर्षभरात पळून जाऊन लग्न करण्याचा सपाटा सुरू असल्याबद्दल समाजातही चिंता व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवण्याचे प्रकार समोर आले आहे.

नोंद नसणाऱ्यांची संख्या

पळून जाऊन लग्न करणाऱ्यांमध्ये नोंद नसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोलिसांकडील आकडेवारीनुसार 31 डिसेंबरपर्यंत 15 पुरुष, 18 वर्षापुढील 22 तरुणी, विवाहित असलेल्या 19 महिला घरातून निघून गेल्या होत्या. तसेच 6 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. राजगड पोलिसांना बेपत्ता झालेल्या जवळपास सर्वच व्यक्तींना शोधण्यात यश आले आहे. यामध्ये प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या तरुण – तरुणींची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पळून जाऊन लग्न करण्याचे प्रकार चित्रपट आणि मालिकांमुळे वाढत असल्याचा आरोप समाजातील लोकांकडून केला जात आहे. मुले-मुली एकच समाजाचे असतील तर या लग्नास विरोध होत नाही, परंतु दोन वेगळ्या समाजातील युवक-युवती असतील तर यामुळे तणाव निर्माण होतो.

तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....