AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेने सात कार्यकर्त्यांवर केली कारवाई , ५० जणांनी दिले राजीनामे

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार मनसेचे काही जण करत होते. त्यातील रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

मनसेने सात कार्यकर्त्यांवर केली कारवाई , ५० जणांनी दिले राजीनामे
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2023 | 2:57 PM
Share

पुणे : कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी आज संपणार आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये होणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही काही कार्यकर्ते काँग्रेस उमेदवार रवींद्र घंगेकर यांचा प्रचार करत होते. त्यातील सात जणांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर सुमारे पन्नास जणांनी राजीनामे दिल्यामुळे कसब्यात मनसेला खिंडार पडले.

मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला (MVA) मदत होणार नाही याची काळजी घ्या. जास्तीत जास्त भाजपला मतदान करण्यासाठी कामाला लागा, असे आदेश दिले होते. या निवडणुकीत मनसे उघडपणे प्रचारात उतरणार नाही, मात्र मनसेची १०० टक्के मदत भाजपला व्हायला हवी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

कोणावर झाली कारवाई

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार मनसेचे काही जण करत होते. त्यातील रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मनसेच्या या कारवाईनंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास जणांनी राजीनामे दिले. या सर्वांनी आपला राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठवला आहे. कसब्यात मनसेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे.

प्रचार संपणार, छुपा प्रचार राहणार

कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. मतदान २६ फेब्रुवारी रोजी आहे. त्यामुळे दोन दिवस छुपा प्रचार व पडद्यामागील रणनिती आखण्यात जाणार आहे.

सट्टेबाज सक्रीय

सट्टेबाजांकडून निकालाबाबत अंदाज लावले जात आहेत. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक सभा, बैठक, रॅली याकडे सट्टेबाजांचे लक्ष ठेवले आहे. कोणाला किती प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार संबंधित उमेदवाराचा सट्टाबाजारातील ‘भाव’ ठरत आहे. जो उमेदवार विजयी होणार त्याला कमी भाव तर पराभूत होणाऱ्या उमेदवाराला जादा भाव सट्टेबाजांकडून दिला जातो.

प्रचारात सुरू झालेला हा सट्टा बाजार मतदानाचा दिवस व मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेजीत असतो. क्षणाक्षणाला अंदाज बदलत असतात. त्यानुसार सट्टाबाजारातील उलाढाल होत असते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.