AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Upate | मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, महाराष्ट्रातून कधीपासून परतणार पाऊस

Monsoon Withdrawal from Rajasthan | सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला आणि मान्सूनचा परतीचा प्रवासाचे वेध लागले. यंदा उशिराने आलेले मान्सूनचा परतीचा प्रवासही उशिराने सुरु झाला आहे. राज्यात कधीपासून परतणार मान्सून...

Monsoon Upate | मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, महाराष्ट्रातून कधीपासून परतणार पाऊस
rainImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 26, 2023 | 7:48 AM
Share

पुणे | 26 सप्टेंबर 2023 : राज्यात यंदा उशिराने मान्सून दाखल झाला. दरवर्षी ७ जून रोजी येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. यामुळे सर्वच क्षेत्रात चिंता व्यक्त होऊ लागली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला. यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सरासरी गाठण्याची शक्यता आहे. आता मान्सूनचा परतीचा प्रवासाचे वेध लागले आहे. राजस्थानमधून मान्सूनने उशिरानेच परतीचा प्रवास सुरु केला.

कधीपासून सुरु होणार परतीचा मान्सून

नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने राजस्थानमधून परतीचा प्रवास उशिराने सुरु केला आहे. मान्सून राजस्थानमधून १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु करतो. परंतु यंदा उशिराने २५ सप्टेंबरपासून मान्सूनने परत फिरण्यास सुरुवात केल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. या वर्षी देशात मान्सूनने २ महिने आणि २३ दिवस आपला मुक्काम केला. आता राजस्थानमधून नौखरा, जोधपूरमधून परत जाण्यासा सुरुवात केली आहे. मान्सूनने २०२१ मध्ये ६ ऑक्टोबरपासून परतीचा प्रवास सुरु केला होता. तर २०२२ मध्ये २० सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु केला होता.

राज्यातून कधी परणार मान्सून

महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली. राजस्थानमधून मान्सून माघारी फिरत असला तरी राज्यातून अजूनही सक्रीय आहे. २६ सप्टेंबर रोजी राज्यात धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र यलो अलर्ट दिला. कोकण, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठाही वाढला आहे. त्यामुळे आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला आहे.

पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस

पुणे जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पुणे परिसरातील धरणे भरली आहे. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असताना शेतीला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात झालेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी दिसत आहेत.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.