AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : कुठे मुसळधार ते कुठे उष्णतेची लाट, काय आहे मान्सूनचा मूड

Monsoon Update : राज्यात नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाकडून ११ जून रोजी करण्यात आली होती. परंतु मान्सून अजूनही सक्रीय नाही. शेतकऱ्यांनी पेरणी अजून करु नये. जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊन जुलैमध्ये पेरणी करावी.

Monsoon Update : कुठे मुसळधार ते कुठे उष्णतेची लाट, काय आहे मान्सूनचा मूड
monsoon and farmer
| Updated on: Jun 19, 2023 | 8:46 AM
Share

पुणे, नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ येऊन गेले. परंतु या चक्रीवादळाने आपले परिणाम दाखवला. चक्रीवादळामुळे देशातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. तर काही भागात उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल थांबली आहे. चक्रीवादळाने मान्सूनवर परिणाम केला आहे. राज्यात मान्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. तो थांबला आहे. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

कुठे सुरु आहे मुसळधार पाऊस

बिपरजॉय वादळाचा परिणाम देशातल्या मान्सूनवर झाला आहे. गुजरात आणि राजस्थान राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. आसाम मेघालय मणिपूर मिझोरम राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. ईशान्येकडील राज्यांमध्येही मुसळधार पाऊस होत आहेत. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रासह अनेक राज्यात मात्र उष्णतेची लाट आली आहे. उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल तेलंगणा राज्यात उष्णतेची लाट आहे. पावसाचा असलेला जून महिना संपण्यात काही दिवस असताना या राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे.

आतापर्यंत किती झाला पाऊस

जून महिन्यात संपूर्ण देशभरात फक्त 37 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील मान्सून अजूनही कोकणात थांबला आहे. २२ जूननंतर त्याची वाटचाल सुरु होणार आहे. कोकणात २२ जूनपर्यंत काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

पेरणी कधी करावी

राज्यात अजूनही पाऊस सुरु झालेला नाही. येत्या पंधरवड्यात कोकण, विदर्भ अन् मराठवाड्यात पेरणीयोग्य तर सह्याद्री घाटामध्ये अन् मध्ये महाराष्ट्रात साधारण मोसमी पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ७ जुलैनंतर जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊन पेरणीचा निर्णय घ्यावा, असे निवृत्त हवमान अधिकारी माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.

शेतकरी हतबल

हवामान खात्याच्या अंदाजा वरून यंदा मान्सून लवकर येणार असा अंदाज व्यक्त केला केला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते आणि त्यांनी मोठ्या उत्साहाने मान्सूनपूर्व कपाशी लागवड केली मात्र यावर्षी हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. मृग नक्षत्र लागून व जून महिना संपत येत असला तरीही तापमानात वाढ तेवढीच आहे. उष्णतेच्या तडाख्याने होरपळलेल्या जीवाची लाही लाही होताना दिसत आहे.

दुपारच्या वेळेस अचानक आभाळ दाटून येत असले तरीही पाऊस काही पडत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी आपल्या परीने कपाशी लागवड करून आपल्या सोयीने सिंचन ने पाणी देणे सुरू केले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नसून फक्त वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांची मात्र कपाशी लागवड अजूनही झाली नाही. आता मान्सून केव्हा दाखल होणार अशा चिंतेने शेतकरी वर्ग हतबल झालेला दिसत आहे.

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.