AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: राजू शेट्टी मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढणार

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल. | Raju Shetty

मोठी बातमी: राजू शेट्टी मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढणार
| Updated on: Dec 16, 2020 | 3:53 PM
Share

पुणे: मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी (Mukesh Ambani) यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके (Farm laws) लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केला. (Raju Shetty march on Mukesh Ambani office in Mumbai)

राजू शेट्टी यांनी बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर 22 तारखेला मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल. या मोर्चात बच्चू कडू आणि बाबा आढाव यांच्या संघटनांचाही सहभाग असणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

मोदी सरकारने शेतकऱ्यांवर कृषी कायदे जबरदस्तीने लादले

शेतकऱ्यांनी ज्या कायद्यांची मागणीच केली नाही ते कायदे शेतकऱ्यांवर लादण्यात आले. सरकारला शेतकऱ्यांना काही द्यायचंच असेल तर हमीभाव द्या. दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. यावरून शेतकऱ्यांच्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाला मान्य असल्याचे दिसत आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी संघटना एकत्र असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 21 वा दिवस

दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. आज या आंदोलनाचा 21 वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली. या नोटीसवर आता केंद्र सरकार काय स्पष्टीकरण देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या:

‘कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलेय’

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

(Raju Shetty march on Mukesh Ambani office in Mumbai)

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.