AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग

आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी 2 हजारपेक्षा अधिक महिला शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग
| Updated on: Dec 16, 2020 | 12:44 AM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीसह देशभरामध्ये आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारसोबत शेतकरी संघटनांच्या 5 बैठका झाल्या. मात्र, यामध्ये तोडगा निघाला नाही. यानंतर आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी 2 हजारपेक्षा अधिक महिला शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याने आंदोलनाची ताकद वाढताना पाहायला मिळत आहे. कायदा रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका महिला शेतकऱ्यांनी घेतली आहे (More than 2 thousands of Women farmer join Farmer Protest in Delhi).

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 2 हजारापेक्षा जास्त महिला सहभाग घेण्यासाठी दिल्ली जवळच्या सीमारेषेवर आल्या आहेत. यामध्ये सिंधू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, पलवल बॉर्डर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला शेतकऱ्यांसोबत आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांच्याकडून आंदोलकांना जेवणाची व्यवस्था करण्यातही मदत केली जात आहे.

सिंधू बॉर्डर येथील आंदोलनामध्ये महिलांनी कृषी कायद्याविरोधातील लढाईत थेट दंड थोपटले आहेत. केंद्र सरकार जोपर्यंत कायदा परत घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहिल आहे, असं मत पंजाबच्या महिला शेतकरी व्यक्त करत आहेत. पटियालाच्या महिला शेतकरी परमिंदर आणि भटिंडाच्या महिला शेतकरी गुमनाम यांनी आंदोलकांच्या वतीने भूमिका मांडली.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग झाला आहे. नारी शक्तीमुळे आता आंदोलनाला भक्कम ताकद मिळेल असं मत राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पुरुष आणि महिलांचा सहभाग मोठा आहे. सरकार जोपर्यंत निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा विश्वास आंदोलक शेतकरी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारता, मग देशात घोषित आणीबाणी आहे का? : उद्धव ठाकरे

नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा, जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांची भूमिका

शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी

व्हिडीओ पाहा :

More than 2 thousands of Women farmer join Farmer Protest in Delhi

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.