AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग

आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी 2 हजारपेक्षा अधिक महिला शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग
| Updated on: Dec 16, 2020 | 12:44 AM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीसह देशभरामध्ये आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारसोबत शेतकरी संघटनांच्या 5 बैठका झाल्या. मात्र, यामध्ये तोडगा निघाला नाही. यानंतर आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी 2 हजारपेक्षा अधिक महिला शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याने आंदोलनाची ताकद वाढताना पाहायला मिळत आहे. कायदा रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका महिला शेतकऱ्यांनी घेतली आहे (More than 2 thousands of Women farmer join Farmer Protest in Delhi).

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 2 हजारापेक्षा जास्त महिला सहभाग घेण्यासाठी दिल्ली जवळच्या सीमारेषेवर आल्या आहेत. यामध्ये सिंधू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, पलवल बॉर्डर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला शेतकऱ्यांसोबत आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांच्याकडून आंदोलकांना जेवणाची व्यवस्था करण्यातही मदत केली जात आहे.

सिंधू बॉर्डर येथील आंदोलनामध्ये महिलांनी कृषी कायद्याविरोधातील लढाईत थेट दंड थोपटले आहेत. केंद्र सरकार जोपर्यंत कायदा परत घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहिल आहे, असं मत पंजाबच्या महिला शेतकरी व्यक्त करत आहेत. पटियालाच्या महिला शेतकरी परमिंदर आणि भटिंडाच्या महिला शेतकरी गुमनाम यांनी आंदोलकांच्या वतीने भूमिका मांडली.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग झाला आहे. नारी शक्तीमुळे आता आंदोलनाला भक्कम ताकद मिळेल असं मत राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पुरुष आणि महिलांचा सहभाग मोठा आहे. सरकार जोपर्यंत निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा विश्वास आंदोलक शेतकरी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारता, मग देशात घोषित आणीबाणी आहे का? : उद्धव ठाकरे

नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा, जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांची भूमिका

शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी

व्हिडीओ पाहा :

More than 2 thousands of Women farmer join Farmer Protest in Delhi

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.