AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजी महाराजासंदर्भातील भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम, पुण्यात काय लावले बॅनर

पुण्यात बॅनर लावले गेले आहे. त्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो आहे. त्यात संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संभाजी महाराजासंदर्भातील भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम, पुण्यात काय लावले बॅनर
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बॅनर लावले आहे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 13, 2023 | 10:27 AM
Share

पुणे संभाजी महाराज धर्मरक्षक होते? या विषयावर राज्यात वाद पेटला असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar)आपल्या भूमिकेवर ठाम होते. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यानंतर आता शरद पवार यांनी सावध भूमिका घेतली होती. ज्याल जे हवे ते म्हणावे, असे ते म्हणाले होते. परंतु आता पुण्यात बॅनलबाजीमुळे पुन्हा हा विषय पेटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं रोखठोक वक्तव्य केलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं तात्काळ आक्षेप घेतला. भाजपने अजित पवार यांच्या विरोधात आंदोलनंही सुरु केली होती. औरंगजेबनं छत्रपती संभाजी महाराजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याची ऑफर दिली होती. पण संभाजी महाराजांनी तीव्र यातना सहन केल्या. मात्र त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही. त्यामुळं संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं जातं. तर स्वराज्य रक्षक म्हणजे, सर्वांचं…मातृभूमीचं रक्षण करणारा. पण राष्ट्रवादी किंवा अजितदादांचं म्हणण्याशी भाजप आणि शिंदे गट सहमत नाही. संभाजीराजेंनी स्वराज्याचं रक्षण करण्याबरोबरच, धर्माचंही रक्षण केलं. त्यामुळं संभाजीराजे धर्मवीरही होते, असं भाजपसह शिंदे गटाचं म्हणणे आहे.

या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते, संभाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात आस्था आहे. या आस्थेतून रत्येक जण आपल्या मतानुसार त्यांना बिरुद लावतो. त्यासाठी वाद करण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर राज्याचं रक्षण करण्यासाठी संभाजीराजे यांनी काम केलं. त्यामुळे कोणी त्यांना स्वराज्यरक्षक म्हणत असेल तर तेही चुकीचं नाही, असे शरद पवारा यांनी नमूद केलं.

पुण्यात पुन्हा लागले बॅनर

हा विषय आता शांत झाला असताना पुण्यात बॅनर लावले गेले आहे. त्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो आहे. त्यात संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार