AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजी महाराजासंदर्भातील भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम, पुण्यात काय लावले बॅनर

पुण्यात बॅनर लावले गेले आहे. त्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो आहे. त्यात संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संभाजी महाराजासंदर्भातील भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम, पुण्यात काय लावले बॅनर
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बॅनर लावले आहे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 13, 2023 | 10:27 AM
Share

पुणे संभाजी महाराज धर्मरक्षक होते? या विषयावर राज्यात वाद पेटला असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar)आपल्या भूमिकेवर ठाम होते. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यानंतर आता शरद पवार यांनी सावध भूमिका घेतली होती. ज्याल जे हवे ते म्हणावे, असे ते म्हणाले होते. परंतु आता पुण्यात बॅनलबाजीमुळे पुन्हा हा विषय पेटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं रोखठोक वक्तव्य केलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं तात्काळ आक्षेप घेतला. भाजपने अजित पवार यांच्या विरोधात आंदोलनंही सुरु केली होती. औरंगजेबनं छत्रपती संभाजी महाराजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याची ऑफर दिली होती. पण संभाजी महाराजांनी तीव्र यातना सहन केल्या. मात्र त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही. त्यामुळं संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं जातं. तर स्वराज्य रक्षक म्हणजे, सर्वांचं…मातृभूमीचं रक्षण करणारा. पण राष्ट्रवादी किंवा अजितदादांचं म्हणण्याशी भाजप आणि शिंदे गट सहमत नाही. संभाजीराजेंनी स्वराज्याचं रक्षण करण्याबरोबरच, धर्माचंही रक्षण केलं. त्यामुळं संभाजीराजे धर्मवीरही होते, असं भाजपसह शिंदे गटाचं म्हणणे आहे.

या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते, संभाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात आस्था आहे. या आस्थेतून रत्येक जण आपल्या मतानुसार त्यांना बिरुद लावतो. त्यासाठी वाद करण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर राज्याचं रक्षण करण्यासाठी संभाजीराजे यांनी काम केलं. त्यामुळे कोणी त्यांना स्वराज्यरक्षक म्हणत असेल तर तेही चुकीचं नाही, असे शरद पवारा यांनी नमूद केलं.

पुण्यात पुन्हा लागले बॅनर

हा विषय आता शांत झाला असताना पुण्यात बॅनर लावले गेले आहे. त्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो आहे. त्यात संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Follow Us
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवार
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत...
एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक!
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी...
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट
NDA प्रवेशाच्या चर्चांवर संजय गायकवाडांचं मोठं विधान
शरद पवार आहेत तोपर्यंत...; NDA प्रवेशाच्या चर्चांवर संजय गायकवाडांचं मोठं विधान
आघाडी सरकारने 14 कारणं देत...मिसिंग लिंकचा फडणवीसांनी इतिहास मांडला, व
आघाडी सरकारने 14 कारणं देत...मिसिंग लिंकचा फडणवीसांनी इतिहास मांडला, विरोधकांना घेरलं!
इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना येऊ नका, सरकारचं मोठं आवाहन
Alandi Indrayani River Flood | पालखीपूर्वीच आळंदी संकटात! इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना येऊ नका, सरकारचं मोठं आवाहन