AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar | “काही जण ईडीच्या..”, शरद पवार यांचा अजित पवार गटावर निशाणा

Sharad Pawar Pune | शरद पवार यांनी पुण्यात बोलताना केंद्र सरकारच्या निर्णयावरुन जोरदार टीका केली. तसेच अजित पवार गटाचं नाव न घेता निशाणा साधला.

Sharad Pawar | काही जण ईडीच्या.., शरद पवार यांचा अजित पवार गटावर निशाणा
| Updated on: Aug 20, 2023 | 6:16 PM
Share

पुणे | केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शुल्कावर 40 टक्क्यांनी वाढ केली. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्क वाढीच्या निर्णयाविरोधात राज्यात ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक बागलाणमध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुतळ्याची होळी करण्यात आली. पुण्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. तर अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. राज्यभर या निर्णयाचे पडसाद उमटत असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे. तसेच शरद पवार यांनी अजित पवार गटावरही निशाणा साधला.

शरद पवार काय म्हणाले?

“कांदा उत्पादकाच्या संसारात हात घालण्याच काम आज केंद्र सरकारने केलं आहे. कांदा निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडलेत. कांद्यावर शुल्कवाढ केल्याने शेतकऱ्यांसाठी जगातलं मार्केट बंद झालं.”, अशा शब्दात शरद पवार यांनी शुल्कवाढीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमाला जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची उपस्थितीही होती.

अजित पवार गटावर निशाणा

“अलीकडे आपल्यातील काही लोकं पक्षाबाहेर गेले आहेत. आम्ही विकासासाठी तिकडे गेलो असं त्यांच्याकडून सांगितले जातं, मात्र त्यात काही अर्थ नाही.  मात्र काही लोकांमध्ये ईडी लागली होती, त्यामुळे आपले लोक तिकडे गेलेत. अनिल देशमुख 14 महिने जेलमध्ये गेले होते, मात्र त्यांनी सांगितले. मी काही केलं नाही त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही. पक्षांतर केलं म्हणजे काय केलं, भाजपच्या दावणीला जाऊन बसलेत. आज भाजप जे सांगेल ते त्यांना करावं लागत आहे. आमच्या बाजूने या अन्यथा आम्ही दुसऱ्या ठिकाणी पाठवू. दुसऱ्या जागेची भीती म्हणून आपल्या सहकारी भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत”, असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. तसेच भाजपलाही सुनावलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.