AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur wari : ‘इंद्रायणी’चं प्रदुषित पाणी वापराल तर…; आळंदी नगरपरिषदेनं वारकऱ्यांना केलं सावध, वाचा काय म्हटलं?

21 जून रोजी पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या आळंदीत दरवर्षीप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यात सहभागी होण्यास वारकरी येथे दाखल झाले आहेत. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे नगर परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे.

Pandharpur wari : 'इंद्रायणी'चं प्रदुषित पाणी वापराल तर...; आळंदी नगरपरिषदेनं वारकऱ्यांना केलं सावध, वाचा काय म्हटलं?
प्रदुषित झालेली इंद्रायणी नदीImage Credit source: tv9
| Updated on: Jun 19, 2022 | 4:35 PM
Share

पुणे : इंद्रायणी नदीचे (Indrayani river) प्रदूषित पाणी वापरू नये, असे आवाहन आळंदी नगर परिषदेने केले आहे. एक आदेश जारी करून पुढील काही दिवस हे प्रदुषित पाणी न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. वारी पंढरीकडे निघणार आहे. राज्यभरातून भाविक, वारकरी (Warkaris) आळंदीत दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अंकुश जाधव म्हणाले, की राज्यभरातून आळंदीत वारकरी येतात. ते नदीत स्नान करतात. काही जण तर नदीचे पाणी पितात. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ही प्रथा रोखण्यासाठी आम्ही एक विशिष्ट आदेश जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पाण्यात विषारी फेसाचा (Toxic foam) जाड थर निर्माण झाला आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

गाळ काढण्याचे काम

21 जून रोजी पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या आळंदीत दरवर्षीप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यात सहभागी होण्यास वारकरी येथे दाखल झाले आहेत. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. शनिवारी आम्ही घाट भागातून जलकुंभ साफ केला आहे, जिथे जास्तीत जास्त वारकरी नदीत पवित्र स्नान करतात. त्यामुळे पुढील काही दिवस शहरात राहताना त्यांना अडचणी येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष टीम

नदीच्या स्वच्छतेसाठी कामगार आणि अर्थमूव्हर्सची एक टीम तयार केली आहे. टीमने नदीतून आधीच जलकुंभ काढला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय राज्य पाटबंधारे विभागाने शनिवारी देहू येथील धरणातून पाणी सोडले आहे, अशी माहिती देण्यात आली. इंद्रायणी नदीत अनेक भाविक स्नान करत असतात. तर काही भाविक इंद्रायणीचे पाणी तीर्थ म्हणून पितात. मात्र आता इंद्रायणीचे पाणी अस्वच्छ झाले आहे. या पाण्यात स्नान करणे तर लांबच हातपायदेखील धुणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. यासर्व आरोग्य समस्या उद्भवण्याच्या आधीच आळंदी नगर परिषदेने वारकऱ्यांना सतर्क केले आहे.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.