AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur wari : ‘इंद्रायणी’चं प्रदुषित पाणी वापराल तर…; आळंदी नगरपरिषदेनं वारकऱ्यांना केलं सावध, वाचा काय म्हटलं?

21 जून रोजी पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या आळंदीत दरवर्षीप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यात सहभागी होण्यास वारकरी येथे दाखल झाले आहेत. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे नगर परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे.

Pandharpur wari : 'इंद्रायणी'चं प्रदुषित पाणी वापराल तर...; आळंदी नगरपरिषदेनं वारकऱ्यांना केलं सावध, वाचा काय म्हटलं?
प्रदुषित झालेली इंद्रायणी नदीImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 19, 2022 | 4:35 PM
Share

पुणे : इंद्रायणी नदीचे (Indrayani river) प्रदूषित पाणी वापरू नये, असे आवाहन आळंदी नगर परिषदेने केले आहे. एक आदेश जारी करून पुढील काही दिवस हे प्रदुषित पाणी न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. वारी पंढरीकडे निघणार आहे. राज्यभरातून भाविक, वारकरी (Warkaris) आळंदीत दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अंकुश जाधव म्हणाले, की राज्यभरातून आळंदीत वारकरी येतात. ते नदीत स्नान करतात. काही जण तर नदीचे पाणी पितात. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ही प्रथा रोखण्यासाठी आम्ही एक विशिष्ट आदेश जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पाण्यात विषारी फेसाचा (Toxic foam) जाड थर निर्माण झाला आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

गाळ काढण्याचे काम

21 जून रोजी पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या आळंदीत दरवर्षीप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यात सहभागी होण्यास वारकरी येथे दाखल झाले आहेत. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. शनिवारी आम्ही घाट भागातून जलकुंभ साफ केला आहे, जिथे जास्तीत जास्त वारकरी नदीत पवित्र स्नान करतात. त्यामुळे पुढील काही दिवस शहरात राहताना त्यांना अडचणी येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष टीम

नदीच्या स्वच्छतेसाठी कामगार आणि अर्थमूव्हर्सची एक टीम तयार केली आहे. टीमने नदीतून आधीच जलकुंभ काढला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय राज्य पाटबंधारे विभागाने शनिवारी देहू येथील धरणातून पाणी सोडले आहे, अशी माहिती देण्यात आली. इंद्रायणी नदीत अनेक भाविक स्नान करत असतात. तर काही भाविक इंद्रायणीचे पाणी तीर्थ म्हणून पितात. मात्र आता इंद्रायणीचे पाणी अस्वच्छ झाले आहे. या पाण्यात स्नान करणे तर लांबच हातपायदेखील धुणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. यासर्व आरोग्य समस्या उद्भवण्याच्या आधीच आळंदी नगर परिषदेने वारकऱ्यांना सतर्क केले आहे.

Follow Us
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...