AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाहा शिक्षणासाठी मुलांना कशी करावी लागतेय धोकादायक कसरत, थर्माकोलची नाव, सापांशी सामना अन्…

Pune News : देशात मुलांच्या शिक्षणासाठी अनेक योजना आहेत. सहा ते १४ वर्षांच्या मुलांसाठी शिक्षण हक्क कायदा करण्यात आला आहे. परंतु गावपातळीवर परिस्थिती वेगळीच आहे. असेच हे एक गाव आहे जेथे...

पाहा शिक्षणासाठी मुलांना कशी करावी लागतेय धोकादायक कसरत, थर्माकोलची नाव, सापांशी सामना अन्...
| Updated on: Aug 27, 2023 | 1:01 PM
Share

पुणे | 27 ऑगस्ट 2023 : मुलांच्या शिक्षणास प्राधान्य देणाऱ्या अनेक योजना देशात राबवल्या जात आहेत. शिक्षण हक्क कायदा करुन मुलांना शिक्षणाचा हक्क दिला गेला आहे. मुलांना शाळेत येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी माध्यान भोजन योजना आहे. एकही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी दुर्गम भागात शाळा उघडल्याचे दावे केले जात आहेत. परंतु त्याचवेळी शाळेत जाण्यासाठी मुलांना धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पुणे-औरंगाबाद मार्गावरील एका गावात दिसत आहे.

काय आहे त्या गावातील परिस्थिती

औरंगाबाद जिल्ह्यातील धनोरा गाव पुणे-औरंगाबाद महामार्गापासून फक्त पाच किलोमीटरवर आहे. जायकवाडी प्रकल्पामुळे हे गाव दोन भागात विभागले गेले. गावात दुसऱ्या भागात शाळा आहे. यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी मुलांना नावेतून प्रवास करावा लागतो. मुलांकडे नाव नाही. मग थर्माकोलची नाव त्यांच्या पालकांनी बनवली. तिचा वापर करुन मुले शाळेत जातात. परंतु त्यांचे आव्हान येथेच संपत नाही. पाण्यात विषारी सापही असतात. त्यांना दूर करण्यासाठी आम्हाला नेहमी काठीचा वापर करावा लागत असल्याचे अकरा वर्षीची प्राजक्ता काळे हिने सांगितले.

परिस्थिती 47 वर्षांपासून तशीच

गावातील ही समस्या आताच निर्माण झालेली नाही. गेल्या 47 वर्षांपासून ही परिस्थिती आहे. धनोरा गावाच्या तीन बाजूला पाणी आहे. शिवना नदीसुद्धा गावाला लागून आहे. या नदीवर पूल नाही. जर मुलांनी पाण्यातून प्रवास केला नाही तर त्यांना 25 किमी चिखलातून रोज प्रवास करावा लागेल. गावकऱ्यांना या ठिकाणी पूल हवा आहे. त्यासाठी ते अनेक वर्षांपासून मागणी करत आहे.

तहसीलदाराने केला अहवाल

गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. त्याचा अहवाल तयार केला आहे. त्यांनी म्हटले की, जायकवाडी प्रकल्पाच्या वेळी संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु काही परिवारांना आपल्या शेतातच राहायचे आहे. यामुळे त्यांच्या मुलांना पाण्यातून प्रवास करावा लागतो. हा प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला होता.

Follow Us
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक....
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक.....
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल.
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत.
साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे
साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून...
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून....
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी.