AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद मोहोळ याच्या पत्नीस भाजप प्रवेश, अजित पवार यांची एका वाक्यात प्रतिक्रिया

pune gangster sharad mohol : शरद मोहोळ याच्या पत्नीचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला आहे. त्यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोजक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद मोहोळ याच्या पत्नीस भाजप प्रवेश, अजित पवार यांची एका वाक्यात प्रतिक्रिया
| Updated on: Apr 21, 2023 | 12:49 PM
Share

योगेश बोरसे, पुणे : राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे, अशी टीका वारंवार होत असते. आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीला चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश दिला गेला आहे. स्वाती मोहोळ भाजपमध्ये प्रवेश करणार यासंदर्भात चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात मोजक्या शब्दांत आपले मत मांडले आहे.

पुणे बँक प्रथम

अजित पवार यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, सर्व निकषांमध्ये पुणे जिल्हा सहकारी बँक राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेला 2022-23 मध्ये 351 कोटी 39 लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा ढोबळ एनपीए 4.51 टक्के आहे. बँक 8 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. विदेशात शिक्षण घेण्यासाठी 40 लाखांपर्यंत आणि देशात शिक्षणासाठी 30 लाखापर्यंत 6 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे.

बड्या लोकांना कर्ज माफ

मावळमधील शेतकऱ्यांना चिक्की उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहकारी बँकाबद्दल रिझर्व्ह बँकेकडून दूजाभाव केला जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. आरबीआयने खासगी तसेच राष्ट्रीयीकृत बँकाना मोकळीक दिली आहे. त्यांनी बड्या लोकांना दिलेली11 लाख 10 हजार कोटींची कर्जे माफ केली जातात. सहकारी बँकांना मात्र कठोर नियम लावले जातात.

यामुळे बैठकीला गैरहजर

पक्षाच्या बैठकीत अजित पवार नव्हते, त्याची चर्चा सुरु झाली. त्यावर बोलताना ते म्हणाले, माझ्या बाबतीत शंका कुशंका डोक्यातून काढा. माझा कार्यक्रम आधीपासून ठरला होता. त्यामुळे बैठकीला नव्हतो.

खारगर घटनेची जबाबदारी सरकारची

खारगरमधील घटनेची जबाबदारी सरकारची आहे. कारण सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला होता. खारघरमधील दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत सरकारने दिलेल्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी राज्यपालांकडे केलीय, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

शरद मोहोळ यांच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

शरद मोहोळ यांच्या पत्नीस भाजपमध्ये प्रवेश दिल्याबद्दल अजित पवार म्हणाले, हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे. पण जनतेने राज्यकर्ते कुठल्या स्तराला चाललेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. माझ्याकडून मागे एक चूक झाली होती, ती मी सुधारली. चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी काही विचार केला असावा.

हे ही वाचा

राजकारणात चर्चा तर होणारच, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गँगस्टराची पत्नी भाजपमध्ये दाखल

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.