AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मनमाड-इंदूर होणार?

पुणे अन् नाशिक शहर रेल्वेने जोडण्याची अपेक्षा अनेक वर्षांपासून आहे. फेब्रुवारी महिन्यात पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला सरकारकडून तत्वतः मान्यता देण्यात आली होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत या प्रकाल्पाचे घोडे पुढे जात नाही. अजूनही हा प्रकल्प कागदावर आहे.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मनमाड-इंदूर होणार?
गतिमान युगाची नांदी
| Updated on: Apr 18, 2023 | 5:50 PM
Share

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातून नाशिकला (Nashik- Pune) जाण्यासाठी सरळ रेल्वे मार्ग नाही. यामुळे या ठिकाणी सेमी हायस्पीड ट्रेनने (Pune Nashik high Speed Train) सुरु करण्याची घोषणा झाली आहे. मध्यंतरी महारेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (महारेल) ने भूसंपादनाचे काम थांबवण्याचे पत्र दिले होते. नाशिक जिल्हाधिकारींना निधी नसल्यामुळे हे काम थांबण्यात आदेश दिले होते. त्यानंतर शासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या अन् महारेलने ते पत्र मागे घेतले. परंतु या मार्गासाठी पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. हा प्रकल्प अजूनही कागदावरच आहे.

पुणे नाशिक रेल्वे अद्याप कागदावरच

फेब्रुवारी महिन्यात पुणे- नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वेला सरकारकडून तत्वतः मान्यता देण्यात आली होती. परंतु पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. यामुळे पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 16 हजार 39 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. ज्या प्रमाणे गेले काही दशकांपासून मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची चर्चा सुरु आहे, त्याचप्रमाणे पुणे-नाशिक प्रकल्पाची फक्त चर्चाच राहणार आहे, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे.

फडणवीस यांची मध्यस्थी

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वे मंत्रालयाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला परवानगी न दिल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर हा रेल्वे मार्ग होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून समस्या सोडवल्या. परंतु अजूनही रेल्वेची तांत्रिक मंजुरी मिळाली नाही.

काय आहे वैशिष्ट्ये

  • पुणे नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणारा हा रेल्वे प्रकल्प
  • पुणे जिल्ह्यातील जवळपास 54 गावांमधून जाणार रेल्वे
  •  235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
  • रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
  •  रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग
  • पुढे हा वेग 250 किलोमीटरपर्यंत वाढवणार
  •  पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
  • वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प
  • पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
  • 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित
Follow Us
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात.
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले...
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले....
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न.
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार...
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार....
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना.
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने.
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?.
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच.