AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

द्राक्ष पिकाबाबत शरद पवार यांचा राज्य सरकारला सल्ला; म्हणाले, कमीत कमी इतके टक्के अनुदान द्या…

Sharad Pawar on Grape Manufacturer Council : पुण्यात भरली द्राक्ष परिषद; शरद पवारांच्या हस्ते द्राक्ष प्रदर्शनाचं उद्घाटन; संबोधित करताना शरद पवार म्हणाले सरकारने अनुदान दिलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचंही कौतुक केलं. म्हणाले...

द्राक्ष पिकाबाबत शरद पवार यांचा राज्य सरकारला सल्ला; म्हणाले, कमीत कमी इतके टक्के अनुदान द्या...
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 27, 2023 | 2:00 PM
Share

पुणे | 27 ऑगस्ट 2023 : पुण्यात आज द्राक्ष परिषदेचं आयोजन करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे द्राक्ष परिषद भरवण्यात आली आहे. या द्राक्ष परिषेदला देशाचे माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली. शरद पवारांच्या हस्ते द्राक्ष प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यांनी या द्राक्ष प्रदर्शनाची पाहणीही केली. यावेळी शरद पवार यांनी द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारला सल्ला दिला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही अनुदान मिळालं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

राज्य सरकारने आढावा घेतला पाहिजे. एकुण क्षेत्र किती आणि पीक किती आहे. त्यांनतर अनेक कामे करता येतील. पावसाने या पिकाच नुकसान होत. त्याचा सुध्दा आढावा सरकारनं घेतला पाहिजे. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावं लागेल. राज्य सरकारनं द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्यावर यावर कमीत कमी 50 टक्के अनुदान देण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.

राज्यात आणि देशात अनेक पिकांच्या संघटना आहेत. उत्तरेकडे सफरचंद पिकाची संघटना आहे. दक्षिणेत नारळाची संघटना आहे. शेतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी देखील अनेक संघटना अनेक राज्यात आहेत.पण मला सांगताना आनंद होतो की, आपली एकमेव संघटना आहे की60 वर्षपसून आपणं भेटतो. आपल्या अडचणी नवे शोध केंद्र आणि राज्य सरकारला सांगतो. संशोधनासाठी आपली संघटना सतत जागरूक असते. तुम्ही हे टिकवून ठेवलं आहे, असं म्हणत शरद पवारांनी या द्राक्ष परिषदेचं कौतुक केलं.

द्राक्ष उत्पादक शेतकरी हा अतिशय कष्टाळू आहे. त्यामुळे त्याचं जीवनमान देखील सुधारलं आहे. तुमच्या कष्टाला आणि संघटनेला तोड नाही. 1960 साली बारामतीत या संघटनेचा जन्म झाला. काही ठराविक लोकं एकत्र येत याची स्थापना करण्यात आली. अनेक लोक अनेक संस्थेत काम करत होते. पूर्वी नवीन वाण भेटत नव्हतं आणि यासाठी अशा अनेक अडचणी सोडवण्यासाठी या संस्थेचा निर्णय झाला. राज्यातील अनेक ठिकाणहून लोकं एकत्र आले. 35 हजार आपले सभासद आहेत. केंद्र राज्य शासनाचे धोरण आणि संशोधन करण्यासाठी ही संस्था महत्वाची आहे, असंही शरद पवार म्हणाले.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.