AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महामार्गावर विचित्र अपघातानंतर शिवसैनिक आक्रमक, पोलिसांवर केले आरोप

Solapur Accident News : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात झाला. हा अपघात पोलिसांमुळेच झाल्याचा आरोप करत शिवसैनिक आक्रमक झाले. आक्रमक शिवसैनिकांनी आंदोलन केले. महामार्ग रोखून धरला.

महामार्गावर विचित्र अपघातानंतर शिवसैनिक  आक्रमक, पोलिसांवर केले आरोप
Image Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 24, 2023 | 9:37 AM
Share

सागर सुरवसे, सोलापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर पोलीस आणि शिवसेनेत वाद झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख अन् पोलिसांत बाचाबाची झाली. या विचित्र अपघातात एका जणाचा मृत्यू झाला. या अपघाताला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

कसा झाला अपघात

सोलापूरातील बाळे येथे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. एकमेकांवर चार वाहने धडकली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन ते चार जण जखमी झालेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी जवळ कंटेनर थांबला. त्यामुळे त्याला पाठीमागून ट्रक, कार आणि दुचाकीने दिली धडक दिल्यामुळे हा अपघातात झाला. पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी पॉईंटमुळेच अपघात झाल्याचा शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आरोप करण्यात आला. या अपघातानंतर शिवसैनिक आक्रमक झाले.

शिवसैनिकांचे आंदोलन

अपघातानंतर आक्रमक शिवसैनिकांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग काही वेळसाठी रोखून धरला. शिवसैनिकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे सोलापूरकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबली होती. नाकाबंदी पाईंट हलवण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक होते. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन नाकाबंदी पॉईंट दुसरीकडे हलवण्याचे आश्वसन दिले. तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी हे आश्वासन दिले.

का केली होती नाकाबंदी

आषाढी वारी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी बाळे येथे केली होती. नाकाबंदी केलेल्या ठिकाणी विचित्र अपघात झाला. त्याला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. या प्रकाराची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे जिल्हाप्रमुखांनी सांगितले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...