AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ShahajiBapu Patil : राष्ट्रवादीने तिजोरी गिळली, शाहजीबापुंचा आरोप, म्हणतात आम्ही ठोका देणारच…

राष्ट्रवादीने राज्याची तिजोरी गिळून टाकली. मात्र आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलो नाही. आम्हीही ठोका देणारच असे म्हणत शहाजी बापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादीला धुतलंय. आजच्या पुरंदरच्या सभेत ते बोलत होते. या सभेत इतरही बडे नेते उपस्थित होते.

ShahajiBapu Patil : राष्ट्रवादीने तिजोरी गिळली, शाहजीबापुंचा आरोप, म्हणतात आम्ही ठोका देणारच...
राष्ट्रवादीने तिजोरी गिळली, शाहजीबापुंचा आरोप, म्हणतात आम्ही मेलेल्या आईचं दूध नाही पिलो, ठोका देणारच...
| Updated on: Aug 02, 2022 | 4:47 PM
Share

पुणे : सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील (ShahajiBapu Patil) एका डायलॉगने देशभर गाजले. मात्र जेव्हापासून ते गुवाहाटीवरून परत आलेत. तेव्हापासून ते संजय राऊत आणि राष्ट्रवादीला (NCP) सतत टार्गेट करत आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेचे आमदारांना निधी मिळू दिला नाही. सर्व निधी हा राष्ट्रवादीच्याच आमदारांना दिला, असा आरोप जवळपास सर्वात बंडखोर आमदार करत (Cm Eknath Shinde) आहेत. शहाजी बापू पाटील यांनीही याच बंडखोरांच्या सुरात सूर मिसळला आहे. आज पुरंदरमध्ये तर शहाजीबापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग केलीय. यावेळी राष्ट्रवादीने राज्याची तिजोरी गिळून टाकली. मात्र आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलो नाही. आम्हीही ठोका देणारच असे म्हणत शहाजी बापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादीला धुतलंय. आजच्या पुरंदरच्या सभेत ते बोलत होते. या सभेत इतरही बडे नेते उपस्थित होते.

शिंदे आम्हाला घेऊन नाही गेले…

यावेळी बोलताना शाहाजी बापू पाटील म्हणाले, आज आपल्या नव्या भूमिकेत आपले मुख्यमंत्री आले आहेत. मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद हवा आहे. जे महाराष्ट्रात राजकारण झालं, त्याला कुणी गद्दार म्हटलं कुणी काय म्हटलं, मात्र क्रांती घडवली आहे.निवडणुका झाल्यानंतर आम्हाला वाटलं भाजप सेना युतीचे सरकार येणार अस वाटलं होतं.मात्र तुम्ही आम्हाला फरफटत नेलं आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं, मात्र असू द्या तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ठाकरे घराण्यात मुख्यमंत्री पद मिळालं, तुमचा पाया पडतो आम्ही 40 आमदार शिंदे साहेबांना घेऊन गेलो, ते नाही आम्हाला घेऊन गेले, असेही यावेळी शाहाजीबापू पाटलांनी यावेळी स्पष्ट केलंय.

आम्हीही ठोका देणारच

आमची काम होत नसतील, तरआपण काम कुठे करायचं? कर्नाटकात जाऊन? असाही सवाल यावेळी बापुंनी केलाय. तर राष्ट्रवादीने तिजोरी गिळून टाकली, असा आरोपही त्यानी केला आहे. तसेच अंतकरणापासून सांगतो कुठलं नेतृत्व पटलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांचे आहे. आम्हीही मेलेल्या आईच दूध पिलो नाही, आम्ही पण ठोका देणार, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे. तर एकनाथ शिंदे यांचे विचार घराघरात पोहचवायचे आहेत. एक एक करून आमदार गेलेत, शिंदे साहेब कधी गेलेत एकालाही कळलं नाही, तुमचं सीआयडी खातं काय करत होतं? असा सवालही त्यांनी गेल्या सरकारला केला आहे. तर आम्ही जे केलं शिवसेना वाचवण्यासाठी केलं, बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी केलं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कुठला मुख्यमंत्री लाभला असेल तर ते एकनाथ शिंदे असे म्हणत त्यांनी शिंदेंचं कौतुक केलंय.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.