AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ShahajiBapu Patil : राष्ट्रवादीने तिजोरी गिळली, शाहजीबापुंचा आरोप, म्हणतात आम्ही ठोका देणारच…

राष्ट्रवादीने राज्याची तिजोरी गिळून टाकली. मात्र आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलो नाही. आम्हीही ठोका देणारच असे म्हणत शहाजी बापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादीला धुतलंय. आजच्या पुरंदरच्या सभेत ते बोलत होते. या सभेत इतरही बडे नेते उपस्थित होते.

ShahajiBapu Patil : राष्ट्रवादीने तिजोरी गिळली, शाहजीबापुंचा आरोप, म्हणतात आम्ही ठोका देणारच...
राष्ट्रवादीने तिजोरी गिळली, शाहजीबापुंचा आरोप, म्हणतात आम्ही मेलेल्या आईचं दूध नाही पिलो, ठोका देणारच...
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Aug 02, 2022 | 4:47 PM
Share

पुणे : सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील (ShahajiBapu Patil) एका डायलॉगने देशभर गाजले. मात्र जेव्हापासून ते गुवाहाटीवरून परत आलेत. तेव्हापासून ते संजय राऊत आणि राष्ट्रवादीला (NCP) सतत टार्गेट करत आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेचे आमदारांना निधी मिळू दिला नाही. सर्व निधी हा राष्ट्रवादीच्याच आमदारांना दिला, असा आरोप जवळपास सर्वात बंडखोर आमदार करत (Cm Eknath Shinde) आहेत. शहाजी बापू पाटील यांनीही याच बंडखोरांच्या सुरात सूर मिसळला आहे. आज पुरंदरमध्ये तर शहाजीबापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग केलीय. यावेळी राष्ट्रवादीने राज्याची तिजोरी गिळून टाकली. मात्र आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलो नाही. आम्हीही ठोका देणारच असे म्हणत शहाजी बापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादीला धुतलंय. आजच्या पुरंदरच्या सभेत ते बोलत होते. या सभेत इतरही बडे नेते उपस्थित होते.

शिंदे आम्हाला घेऊन नाही गेले…

यावेळी बोलताना शाहाजी बापू पाटील म्हणाले, आज आपल्या नव्या भूमिकेत आपले मुख्यमंत्री आले आहेत. मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद हवा आहे. जे महाराष्ट्रात राजकारण झालं, त्याला कुणी गद्दार म्हटलं कुणी काय म्हटलं, मात्र क्रांती घडवली आहे.निवडणुका झाल्यानंतर आम्हाला वाटलं भाजप सेना युतीचे सरकार येणार अस वाटलं होतं.मात्र तुम्ही आम्हाला फरफटत नेलं आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं, मात्र असू द्या तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ठाकरे घराण्यात मुख्यमंत्री पद मिळालं, तुमचा पाया पडतो आम्ही 40 आमदार शिंदे साहेबांना घेऊन गेलो, ते नाही आम्हाला घेऊन गेले, असेही यावेळी शाहाजीबापू पाटलांनी यावेळी स्पष्ट केलंय.

आम्हीही ठोका देणारच

आमची काम होत नसतील, तरआपण काम कुठे करायचं? कर्नाटकात जाऊन? असाही सवाल यावेळी बापुंनी केलाय. तर राष्ट्रवादीने तिजोरी गिळून टाकली, असा आरोपही त्यानी केला आहे. तसेच अंतकरणापासून सांगतो कुठलं नेतृत्व पटलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांचे आहे. आम्हीही मेलेल्या आईच दूध पिलो नाही, आम्ही पण ठोका देणार, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे. तर एकनाथ शिंदे यांचे विचार घराघरात पोहचवायचे आहेत. एक एक करून आमदार गेलेत, शिंदे साहेब कधी गेलेत एकालाही कळलं नाही, तुमचं सीआयडी खातं काय करत होतं? असा सवालही त्यांनी गेल्या सरकारला केला आहे. तर आम्ही जे केलं शिवसेना वाचवण्यासाठी केलं, बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी केलं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कुठला मुख्यमंत्री लाभला असेल तर ते एकनाथ शिंदे असे म्हणत त्यांनी शिंदेंचं कौतुक केलंय.

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा