AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2014 मध्ये शिवसेनेचा काँग्रेसकडं प्रस्ताव?, माणिकराव ठाकरे म्हणतात, प्राथमिक चर्चा

एकनाथ शिंदे यांना विचारा म्हणजे ते सांगतील काय चर्चा झाली होती, असंही त्यांनी म्हटलं.

2014 मध्ये शिवसेनेचा काँग्रेसकडं प्रस्ताव?, माणिकराव ठाकरे म्हणतात, प्राथमिक चर्चा
माणिकराव ठाकरे म्हणतात, प्राथमिक चर्चाImage Credit source: t v 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Sep 29, 2022 | 7:05 PM
Share

योगेश बोरसे, Tv 9 मराठी प्रतिनिधी, पुणे : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता, अस वक्तव्य केलं. अशाप्रकारची प्राथमिक स्वरुपाची चर्चा झाली होती, असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले. पण, ती चर्चा पुढं जाऊ शकली नाही. त्यावेळी भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळं आम्ही काही वेगळा विचार केला नाही, असंही ठाकरे म्हणाले. काँग्रेसचे नेते आणि शिवसेना यांच्यात प्राथमिक चर्चा झाली होती. पण, नेमकी काय चर्चा झाली होती, हे सांगणं माणिकराव ठाकरे यांनी टाळलं.

एकनाथ शिंदे यांना विचारा म्हणजे ते सांगतील काय चर्चा झाली होती, असंही त्यांनी म्हटलं. खर तर एकनाथ शिंदे यांचं भाजपशी जुळत होतं, असं वाटत नाही. त्यामुळं काँग्रेससोबत चर्चा झाली होती, असं माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी एकत्र

महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्र आहोत, असंही ठाकरे म्हणाले. काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरवर यावा, यासाठी नाना पटोले यांच्याकडं जबाबदारी आहे. त्यामुळं पक्ष वाढीसाठी ते योग्य ते बोलत असल्याचं माणिकराव ठाकरे म्हणाले. आजतरी त्यांच्याहून वेगळी अशी आमची काही भूमिका नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पंकजा मुंडे यांनी पक्षात वाईट वागणूक

पंकजा मुंडे यांना पक्षात वाईट वागणूक दिली जात आहे, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. मात्र हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे.

आशिष शेलारांकडे नेमकी कुठली क्लिप आहे मला माहिती नाही. मात्र हे डिवचण्याचं काम आशिष शेलार करत आहेत. उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना राहणार आणि त्यांचेच चिन्ह राहणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय घेतला नाही. याबाबत निवडणूक आयोग तटस्थपणे निर्णय घेणार आहे.

सरकार तर फडणवीस चालवत आहेत

एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांनी बोलून काय उपयोग. कारण सरकार तर फडवणीस आणि भाजप चालवत आहेत. सर्व निर्णय देवेंद्र फडणवीस घेत आहेत. संत गाडगेबाबा यांच्या नावाने दहा सूत्री कार्यक्रम मागच्या सरकारने केला होता. आता या सरकारने तो थांबवलं आहे. फडणवीस यांच्यामुळे तो कार्यक्रम बंद झाला आहे, असाही आरोप त्यांनी लावला.

Follow Us
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन