AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Problems : वाढत्या तापमानाचा पुणेकरांना ताप! त्वचेच्या समस्या वाढल्या, वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…

लहान मुलांमध्ये त्वचेचा कोरडेपणा आणि उष्म्यामुळे काटेरी पुरळ उठण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या मुलांना पालकांनी सैल तसेच सुती कपडे घालावे. त्याचबरोबर थंड खोलीत राहणे आणि घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन (Sunscreen lotion) लावणे अशी खबरदारी घेतल्यास काही प्रमाणात मदत होईल.

Skin Problems : वाढत्या तापमानाचा पुणेकरांना ताप! त्वचेच्या समस्या वाढल्या, वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात...
उन्हाळा आणि त्वचाविकार (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: May 24, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : ढगाळ हवामानामुळे मध्यंतरी काही प्रमाणात चटका देणारे ऊन कमी झाले होते. मात्र या उन्हामुळे त्वचेच्या विविध समस्या (Skin problems) पुणेकरांना भेडसावत आहेत. या उन्हाळ्यात शहरातील अति उष्णतेमुळे अनेक लहान मुले, किशोरवयीन आणि प्रौढांना त्यांच्या त्वचेवर उष्णतेचे (Heat) फोड आणि पुरळ उठताना दिसत आहेत. एका तरुणीने सांगितले, की उष्णतेमुळे डोक्यात छोटे पुरळ आले आहेत. त्यामुळे अंघोळ करताना, केसांना स्वच्छ करताना त्रास होतो. तर त्याच्याच भावाच्या पाठीवर असेच पुरळ आले आहेत. या विषयातील तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांमध्ये त्वचेचा कोरडेपणा आणि उष्म्यामुळे काटेरी पुरळ उठण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या मुलांना पालकांनी सैल तसेच सुती कपडे घालावे. त्याचबरोबर थंड खोलीत राहणे आणि घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन (Sunscreen lotion) लावणे अशी खबरदारी घेतल्यास काही प्रमाणात मदत होईल.

उष्णता कमी करणाऱ्या पदार्थांचे सेवन

मुलांची त्वचा संवेदनशील असते. मुलांनी योग्य खबरदारी न घेतल्यास त्वचेवर जळजळ होऊ शकते. बहुतेक वेळा, काही पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. हे शरीराला संक्रमणास अधिक संवेदनाक्षम बनवते आणि उष्णता उफाळून येते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दररोजच्या आंघोळीसह चांगली स्वच्छता राखताना, घामामुळे कोंडा आणि छिद्र रोखण्यासाठी केस नियमित धुणे आवश्यक आहे. शरीरातील उष्णता कमी करणारे पदार्थ आणि पेये यांचे सेवन केल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते.

हायड्रेटेड राहिल्याने समस्येचा त्रास कमी

रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ झाल्यामुळे थेट फोड होत नाहीत, परंतु त्यामुळे शरीराला उष्णतेच्या फोडांसह संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. लाल मांस, मूळ भाज्या, चरबीयुक्त पदार्थ यांसारखे अन्न टाळावे. त्यासोबतच हायड्रेटेड राहिल्याने शरीराला उष्णतेचे फोड होण्यापासून वाचवण्यास मदत होते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक

उन्हाळ्यात, जास्त आर्द्रतेमुळे, त्वचेवर छिद्रे अडकल्यामुळे उष्णतेचे पुरळ उठतात. अशा समस्या टाळण्यासाठी औषधीयुक्त टॅल्कम पावडर आणि अशा उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये वाढ होत असते. मात्र अशी उत्पादने वापरण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते. अन्यथा त्याचे दुष्परिणामही जाणवू लागू शकतात.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड