AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushma Andhare : राज्यपाल संवेदनशून्य, फडणवीसांनी मलमपट्टी करू नये, वादग्रस्त वक्तव्यावरून सुषमा अंधारेंचा कोश्यारींवर हल्लाबोल

राज्यपाल संवेदनशून्य असून त्यांनी राज्याची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी करत देवेंद्र फडणवीस यांनी मलमपट्टी करू नये, असे खडे बोलदेखील सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सुनावले आहेत.

Sushma Andhare : राज्यपाल संवेदनशून्य, फडणवीसांनी मलमपट्टी करू नये, वादग्रस्त वक्तव्यावरून सुषमा अंधारेंचा कोश्यारींवर हल्लाबोल
सुषमा अंधारेImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 30, 2022 | 4:16 PM
Share

पुणे : राज्यपाल (Governor) हे घटनात्मक पद आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलताना असे विधान करताना काळजी घेतली पाहिजे. मुळात राज्यपाल हे पद पक्षविरहित असून राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. या पदावर बसून असे विधान करणे म्हणजे त्या पदाचा अवमान असल्याची टीका, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर केली आहे. राज्यात एवढे राजकारण सुरू असताना सुद्धा बाळासाहेबांचे सो कॉल्ड वारसदार यांनी त्यांच्या तथाकथित महाशक्तीला विनंती करून तुमच्या राज्यपालांचा राजीनामा घेऊन त्यांना तातडीने परत बोलवा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. तसेच हे राज्यपाल संवेदनशून्य असून त्यांनी राज्याची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी करत देवेंद्र फडणवीस यांनी मलमपट्टी करू नये, असे खडे बोलदेखील सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सुनावले आहेत.

फडणवीसांकडून मलमपट्टी

एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेकवेळा अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो. त्याप्रमाणे राज्यपाल बोलले आहेत. मला विश्वास आहे, की त्यांच्याही मनात मराठी माणसांबद्दल श्रद्धा आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मराठी माणसांचा सहभाग मोठा आहे, याची त्यांना जाणीव असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी करत राज्यपालांचे अप्रत्यक्ष समर्थन केले आहे. राज्यपाल काय बोलले, याबद्दल आम्ही काहीही बोलणार नाही, त्याचा खुलासा राज्यपालच करतील, असेही फडणवीस म्हणाले.

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी म्हणाले, की महाराष्ट्रातून विशेषत: मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसा उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाणार नाही. मराठी माणसांना कमी लेखत गुजराती आणि राजस्थानी समाजामुळे मुंबईत पैसा असल्याचे कोश्यारी म्हणाले होते. आता त्यांच्या या वादग्रस्त आणि महाराष्ट्रासाठी अपमानजनक वक्तव्याचा निषेध होत असून सुषमा अंधारे यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांनी सारवासारव करत मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान असल्याचे म्हटले आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत