AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, नका करू दुनियादारी; महाराष्ट्राविषयीच्या अपमानजनक वक्तव्याचा मनसेकडून निषेध

बई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केले होते.

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, नका करू दुनियादारी; महाराष्ट्राविषयीच्या अपमानजनक वक्तव्याचा मनसेकडून निषेध
राज्यपालांवर टीका करताना हेमंत संभूसImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 30, 2022 | 3:28 PM
Share

पुणे : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी जे विधान केले ते अतिशय चुकीचे आहे, असे म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नका करू दुनियादारी, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि राज्याचे प्रवक्ते हेमंत संभूस (Hemant Sambhus) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राला अपमानास्पद असे वक्तव्य केले आहे, त्याचा सर्वच स्तरातून निषेध होत. आहे. राज्यपाल पदाचा मान कोश्यारींनी धुळीला मिळवला, अशाप्रकारची टीकाही होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेनेही कोश्यारींना लक्ष्य केले आहे. मराठीसाठी आक्रमक असलेल्या मनसेने राज्यपाल कोश्यारींना दुनियादारी करू नका, असे सुनावले आहे. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मनसेचे (MNS) म्हणणे आहे.

‘महाराष्ट्र राज्याचा इतिहास माहीत नाही’

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, नका करू दुनियादारी असे म्हणत हेमंत संभूस यांनी कोश्यारींवर हल्ला चढवला. तुम्ही मराठी द्वेशी असल्याचे वारंवार दाखवून देत आहात. संविधानिक पदावर असताना हे विधान करणे चुकीचे आणि संतापजनक असल्याचा आरोप संभुस यांनी केला आहे. त्याचसोबत राज्यपालांना महाराष्ट्र राज्याचा इतिहास माहीत नाही, अशी जहरी टीकादेखील संभुस यांनी केली आहे.

‘आमच्याकडून स्वत: ला अपमानित करून घेऊ नका’

किती मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे, हे तुम्हाला माहीत नाही. मराठी माणसांनी महाराष्ट्र उभा केला, त्या महाराष्ट्राकडे गुजराती, राजस्थानी आकर्षित झाला. तो निर्भयपणे इथे व्यवसाय करू लागला. आपण काय बोलतो, कुणाविषयी बोलतो, याचे भान कोश्यारी तुम्ही राखले पाहिजे, अशी आठवण त्यांनी करून दिली. त्याचबरोबर आमच्याकडून स्वत: ला अपमानित करून घेऊ नका, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते कोश्यारी?

महाराष्ट्र आणि मराठी माणसांसदर्भात अपमानजनक वक्तव्य करताना कोश्यारी म्हणाले होते, की महाराष्ट्रातून विशेषत: मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाणार नाही. दरम्यान, या वक्तव्याचा राज्यभरातून तीव्र निषेध होत आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत