पुणे: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. गेल्यावेळी ऊठ दुपारी, घे सुपारी, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना डिवचले होते. आता त्यांनी राज ठाकरे यांचा पोस्टमन असा उल्लेख करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे यांनी महाशक्तीला पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माघारी बोलावण्याची मागणी करावी, असा खोचक सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला आहे.