AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maval News : जिल्हा परिषदेच्या शाळेत घ्यावी लागली निवडणूक, ओळखपत्र सोबत ठेऊन विद्यार्थ्यांनी केलं मतदान

PUNE NEWS : मावळ मधील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांना निवडणूक घ्यावी लागली. झालेल्या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी १०० टक्के मतदान केलं आहे. जिल्हा परिषद शाळेत झालेली निवडणूकीची सगळीकडं चर्चा सुरु आहे.

Maval News : जिल्हा परिषदेच्या शाळेत घ्यावी लागली निवडणूक, ओळखपत्र सोबत ठेऊन विद्यार्थ्यांनी केलं मतदान
pune maval newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 11, 2023 | 2:21 PM
Share

रणजित जाधव, मावळ : महाराष्ट्रात राजकीय (Maharasht Politics) गोष्टी अधिक चर्चील्या जातात. महाराष्ट्रातल्या एखाद्या लहान मुलाला राजकारणात बाबत एखादी गोष्ट विचारली तर ते सांगण्याचा प्रयत्न करतात. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोंडी प्रचंड वेग आला आहे. काल मावळ (Pune Maval) तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी घेतलेली निवडणूक अधिक चर्चेची ठरली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांनी ओळखपत्र हातात घेऊन मतदान केलं आहे. मावळातील मळवंडी ठुले या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही निवडणूक झाली आहे. आता ही निवडणूक (Election Process) शिक्षकांनी का घेतली असा अनेकांना प्रश्न पडला असेल ?

या कारणामुळं घेतली निवडणूक

मावळातील मळवंडी ठुले या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणुकीची ओळख व्हावी, निवडणुका आपल्या देशात कशा पद्धतीने होतात? याची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी मावळ मधील शाळेत निवडणूक घेण्यात आली. निवडणुकांचे प्रात्यक्षिक करत यावेळी विद्यार्थ्यांनी हातात प्रतिकात्मक मतदान ओळखपत्र घेत मतदानाचा हक्क बजावला. ज्यावेळी हे सगळं सुरु होतं त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाचं आनंद पाहायला मिळाल्याचं शिक्षक सांगत आहेत. त्याचबरोबर केलेल्या प्रयोगामुळं विद्यार्थ्यांना निवडणूक कशी होते हे सुध्दा समजलं आहे.

शिक्षकांचं कौतुक

जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या लहान मुलांना निवडणुक ही प्रक्रिया काय असते. त्याचबरोबर एखादा उमेदवार कसा निवडून येतो. या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित व्हाव्यात यासाठी निवडणूक प्रक्रिया शाळेत घेण्यात आली होती. प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना कळावी याची काळजी शिक्षकांनी घेतली. या उपक्रमामुळे पालकवर्ग देखील खूष झाला आहे. त्याचबरोबर पालकांनी शिक्षकांचं कौतुक देखील केलं आहे.

प्रत्येक शाळेत असा उपक्रम घेण्यात यावा अस मतं पालकांनी तिथं व्यक्त केलं. कारण या उपक्रमामुळे मुलांना अधिक माहिती मिळत आहे. त्याचबरोबर मुलांच्या ज्ञानात सुध्दा भर पडत आहे.  जिल्हा परिषद शाळेत अशा पद्धतीचे उपक्रम राबविले तर त्याचा विद्यार्थ्यांना अधिक फायदा होईल.

सध्याची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे लोकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेत अशा पद्धतीचे चांगले उपक्रम व्हावेत अशी सुध्दा इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीचे उपक्रम झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.