AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवी हगवणे प्रकरण : न्याय मिळाला नाही तर…, जरांगे पाटलांचा थेट सरकारला इशारा, केली मोठी मागणी

वैष्णवी हगवणे प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे, आता या प्रकरणावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण : न्याय मिळाला नाही तर..., जरांगे पाटलांचा थेट सरकारला इशारा, केली मोठी मागणी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2025 | 8:07 PM
Share

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, वैष्णवी हगवणे या विवाहीत महिलेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे, या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिचा दीर, सासू, सासरा आणि नदंण यांना अटक केली आहे, या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

वैष्णवीने आत्महत्या केली नसून ही हत्या असल्याचं दिसून येत आहे, वैष्णवीच्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, सामूहिक कट रचून ही हत्या असल्याचं यातून दिसून येत आहे. फोटोमध्ये मारल्याचा खूणा स्पष्ट दिसत आहेत. या प्रकरणात मोक्का लावण्याची मागणी होत आहे, मात्र त्याची प्रक्रिया सुरू आहे का? हे कुटुंबाला कोणीच सांगत नाही, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

सत्तेमधील आरोपी आहेत म्हणून हे प्रकरण दाबलं असं वैष्णवीच्या कुटुंबाला वाटलं नाही पाहिजे, फाशी देऊन न्याय झाला पाहिजे, गृह विभाग कमी पडत आहे का? हे या प्रकरणावरून लक्षात येईल, जर न्याय झाला नाही तर पुन्हा उठाव होईल. महिला आयोग यासाठीच आहे, जर महिलांवर अन्याय होणार असेल तर कारवाई झाली पाहिजे.

महिला आयोगावर राजकीय व्यक्ती बसते, ती प्रत्येकाची प्रथा आहे, ज्याची सत्ता येते तो आयोगावर आपला व्यक्ती बसवतो. पण कुणीही या  आयोगावर असेल त्यांनी काम चांगलं केलं पाहिजे जेणेकरून नाव निघेल आणि महिलांना न्याय मिळेल, राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत उद्या बोलले आज वैष्णवीसाठी न्याय मागायला आम्ही आलो आहोत. नेमका काय तपास सुरू आहे, याबाबतची माहिती कुटुंबाला कळवली जात नाही, तपाससंदर्भातील सर्व माहिती कुटुंबाला मिळाली पाहिजे, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....