AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर राजीनामा देणार, लवकरच मी…मंत्र्याच्या थेट विधानाने खळबळ; काय घडतंय?

मनोज जरांगे यांनी येत्या 30 मे रोजीपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर मंत्री राधाकृषण विखे पाटील यांनी सरकारची भूमिके मांडली आहे.

तर राजीनामा देणार, लवकरच मी...मंत्र्याच्या थेट विधानाने खळबळ; काय घडतंय?
manoj jarange patil and devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2026 | 4:38 PM
Share

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारविरोधात रणशिंग फुकले असून थेट आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. ते येत्या 30 मे रोजीपासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समजाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सातारा गॅझेट लागू करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आरक्षणाविषयी सरकारची भूमिका मांडली आहे. तसेच माझ्या राजीनाम्याने जरांगे यांचे समाधान होत असेल तर मी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असेही ते म्हणाले आहेत.

हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी सुरू झाली

राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष झाल्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीची सुरुवात मी सुरुवात केली. आपण अडीच लाख कुणबी दाखले दिलेले आहेत. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचा अध्यक्ष म्हणून मी सर्व आमदारांना पत्र पाठवले आहेत. स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक आमदारांनी प्रयत्न करायला हवेत. सातारा गॅजेटची प्रक्रिया आम्ही आता सुरू केली आहे. सातारा गॅझेटची अंमलबजावणी झालेली नाही हे आम्ही मान्य करतो मात्र प्रक्रिया सुरू आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

तर मी राजीनामा द्यायला तयार आहे

आतापर्यंत आपण मराठा आरक्षणासंदर्भात जे जे काही निर्णय घेतले त्यांना कुठल्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. आंदोलनादरम्यान निधन झालेल्या मराठा आंदोलकांच्या मुलांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. एसटी महामंडळात आम्ही त्यांना नोकरी देत होतो, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. आता महावितरण आणि एमआयडीसीमध्ये नोकरी देण्यासंदर्भामध्ये आम्ही विनंती केली आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसेच उपसमितीचा अध्यक्ष म्हणून माझा राजीनामा दिल्याने जरांगे पाटलांचे समाधान होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे यांची भेट घेणार

तसेच, मी लवकरच जरांगे पाटलांना भेटेल आणि आतपर्यंत केलेल्या कामाची माहिती त्यांना देईल. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते मी दूर करण्याचा प्रयत्न करेल, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.