AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : हजारो मुलींसमोर राहुल गांधींचं मनुस्मृतीवर मोठं भाष्य; तरुणीच्या भविष्याबद्दल बोलताना सांगितलं काँग्रेसचं व्हिजन!

काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुण्यात 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात तरूणाईशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी मनुस्मृतीवर टीका केली. मनुस्मृती महिलांना स्वातंत्र्य नाकारते आणि त्यांना विशिष्ट चौकटीत बसवते, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi :  हजारो मुलींसमोर राहुल गांधींचं मनुस्मृतीवर मोठं भाष्य; तरुणीच्या भविष्याबद्दल बोलताना सांगितलं काँग्रेसचं व्हिजन!
Rahul Gandhi
| Updated on: Aug 22, 2026 | 8:20 PM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात असून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात सहभागी झाले. सभास्थळी मोठ्या उत्साहाने आलेल्या तरूणाईशी, जेन-झी शी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. पुण्यातील कार्यक्रमात संबोधित करताना राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर मोठं भाष्य केलं . “ मनुस्मृतीने महिलांना 3 चौकटीत बसवलं. महिलांना स्वातंत्र्य नाही असा मनुस्मृतीचा विचार ” असं राहुल गांधी म्हणाले. विद्येचे माहेर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते याच कार्यक्रमासाठी पुण्यात होते. दरम्यान आजच्या कार्यक्रमापूर्वी काल पुण्यात एबीव्हीपी आणि एनएसयूआयचे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता, त्याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी दिलखुलास संवाद साधला. पुण्यातील या कार्यक्रमाला मुलींची, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तरुणींच्या भविष्याबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी काँग्रेसचं व्हिजनही सांगितलं. महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी आजच्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भर दिला. महिलांच्या उपस्थितीत त्यांनी पिंजरा तोडा असे आवाहन करत, महिलांनी त्यांच्यातील अद्वितीय क्षमता ओळखून सामाजिक बंधनातून मुक्त व्हावे, असं प्रतिपादन केलं.

काय म्हणाले राहुल गांधी ?

मी आज राजकारणावर बोलणार नाही. भारताची ताकद काय असं मला अनेकदा विचारलं जातं.त्याबद्दल वेगवेगळी उत्तर मिळतात, पण माझं त्यावर स्पष्ट मत आहे. 70 कोटी भारतीय महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. देशातील महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असं ते म्हणाले.

महिलांना केवळ मुलगी, पत्नी किंवा आई या तीन चौकटीत पाहणे चुकीचे आहे. या भूमिका महत्त्वाच्या असल्या तरी, ती त्यांची एकमेव ओळख असू नये, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं. पुढे त्यांनी मनुस्मृतीचा दाखला देत म्हटलं की, मनुस्मृतीत महिलांना बालपणात वडिलांच्या, तारुण्यात पतीच्या आणि पतीच्या निधनानंतर मुलांच्या अधीन ठेवण्याचे म्हटलं आहे, तसेच महिलांनी कधीही स्वतंत्र असू नये असंही नमूद केलं आहे. राहुल गांधींनी या विचारांना लाजिरवाणे संबोधत त्यांचा तीव्र निषेध केला. त्यांनी भारतातील महिलांना, त्यांच्यातील संवेदनशीलता, दयाळूपणा आणि दूरदृष्टीमुळे देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे म्हटले. “ महिला या पुरुषांच्या तुलनेत स्वभावतः अधिक संवेदनशील, सौम्य आणि दयाळू असतात. त्यामुळेच माझा ठाम विश्वास आहे की, भारतातील महिला ही देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

महिलांकडे पाहण्याच्या समाजाच्या पारंपरिक दृष्टिकोनावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की, अनेकदा महिलांची ओळख त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा त्यांच्या कौटुंबिक भूमिकांशी जोडली जाते. पुरुषांशी संवाद साधताना महिलांकडे प्रामुख्याने तीनच चौकटींमध्ये पाहिले जाते— मुलगी, पत्नी किंवा आई. या भूमिका नक्कीच महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यात कोणतीही कमीपणा किंवा गैर नाही. मात्र, एखाद्या महिलेची ओळख केवळ या नात्यांपुरती मर्यादित राहू नये असं ते म्हणाले.

बातमी अपडेट होत आहे. 

Follow Us
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग