AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अगदी घराच्या खालीच मृत्यूनं गाठलं; विरारमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीचा भयानकरित्या मृत्यू

तनिष्का लक्ष्मण कांबळे (वय 15) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. विरार : क्लास वरून घरीजाताना दहावीत शिकणाऱ्या तरुणीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर येथील एब्रोल सोसायटीत ती राहते. विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर परिसरातच ती क्लासला जाते. क्लासवरुन घरी येताना तिचा मृत्यू झालाय.

अगदी घराच्या खालीच मृत्यूनं गाठलं; विरारमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीचा भयानकरित्या मृत्यू
| Updated on: Aug 16, 2022 | 9:26 PM
Share

विरार : मृत्यू कोणाला कधी कुठे आणि कसा गाठेल याचा काही नेम नाही. विरारमध्ये(Virar) दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा भयानक रित्या मृत्यू झाला आहे. क्लास वरून घरी येत असताना अगदी घराच्या खालीच विजेचा शॉक( electric shock) लागून या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलीचा मृत्यूला MSEB चा गलथन कारभार जबाबदार असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

तनिष्का लक्ष्मण कांबळे (वय 15) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. विरार : क्लास वरून घरीजाताना दहावीत शिकणाऱ्या तरुणीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर येथील एब्रोल सोसायटीत ती राहते. विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर परिसरातच ती क्लासला जाते. क्लासवरुन घरी येताना तिचा मृत्यू झालाय.

मागील दोन दिवसांपासून वसई विरार मध्ये रिमझिम पाऊस पडत आहे. यामुळे सासोयटीच्या समोरच्या रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्या पाण्यात रस्त्याच्या खाली असलेली एम.एस.ई.बी.ची केबल ब्रेक झाली होती. यामुळे ब्रेक झालेल्या केबल मधून पाण्यात विजेचा प्रवाह चालू होता. त्याच पाण्यातून जाताना तनिष्कला विजेचा शॉक लागून तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे तिच्या घराच्या जवळच ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेला MSEB चा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक ठिकाणी MSEB च्या केबल उघड्यावर पडल्या आहेत. DP बॉक्स देखील उघडेच आहेत. तनिष्कच्या मृत्यूला MSEB चा निष्काळजपणी जबाबदार आहे.

तनिष्कच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तिचे शेजारी, मित्र-मैत्रिणी यांना देखील तनिष्कच्या मृत्यचे वृत्त आणि कारण समजताच धक्का बसला आहे. पाण्यातून विजेचा प्रवाह होऊन या पाण्यातून चालताना तनिष्कचा मृत्यू झाल्याचे वृत्त विरार शहरात वाऱ्यासारखे पसरले आहे. यामुळे विरार शहरात एकच भितीचे वातावरण पसरले आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.