AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणातून ठाण्याकडे लाकडं घेऊन येत होता ट्रक, पनवेलजवळ ऑईल गळती झाली अन्…

कोकणातून लाकडं घेऊन ठाण्याकडे ट्रक चालला होता. यावेळी पनवेलमधील कर्नाळाजवळ अचानक ट्रकमधील ऑईल लिक होऊ लागले. यामुळे ट्रक अनियंत्रित झाला.

कोकणातून ठाण्याकडे लाकडं घेऊन येत होता ट्रक, पनवेलजवळ ऑईल गळती झाली अन्...
पनवेलमध्ये अनियंत्रित ट्रक महामार्गावर पलटलाImage Credit source: TV9
| Updated on: Apr 01, 2023 | 3:13 PM
Share

पनवेल / रवी खरात : कोकणातून मुंबईत लाकडी घेऊन येणारा ट्रक पलटल्याची घटना आज पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळाच्या हद्दीत घडली. भररस्त्यात ट्रक पलटी झाल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतून कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस आणि वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हायड्राच्या सहाय्याने मार्ग मोकळा करत वाहतूक कोंडी सोडवली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

ऑईल गळती झाल्याने ट्रक अनियंत्रित झाला

कोकणातील खेड येथून ठाणे मुलुंड स्मशानभूमीसाठी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक लाकडे घेऊन चालला होता. पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळाच्या हद्दीत पहाटे पनवेल बाजूकडे भरधाव वेगाने जात असताना ट्रकमधून ऑइल गळती होऊ लागली. यामुळे ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाला. ट्रक पलटल्यानंतर सर्व लाकडे रस्त्यावर पसरली. रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने आणि लाकडं पसरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. पनवेल पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

बंगळुरुहून पुण्याला चाललेल्या ट्रकला अपघात

बेंगलोरहून पुण्याला जाणाऱ्या आयशर कंटेनरचा कोल्हापूर शहराजवळ अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोल्हापूर शहराजवळ हायवेवरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला. काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. हा अपघातग्रस्त आयशर कंटेनर गेल्या 2 तासापासून हायवेवरच आहे. त्यामुळे हायवे पोलिसांनी तात्काळ हा कंटेनर हटवून, वाहातूक सुरळीत सुरू करावे अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.