AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाजीरवाणी गोष्ट म्हणजे यांनी बाळासाहेबांच्या पुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत आज पहिली सभा घेतली. पहिल्याच सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी खालच्या स्तरावर जाऊन बाळासाहेबांच्या नावापुढे लागलेलं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं.

लाजीरवाणी गोष्ट म्हणजे यांनी बाळासाहेबांच्या पुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं - राज ठाकरे
| Updated on: Nov 04, 2024 | 7:52 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीत पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. राज ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नावापुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकल्याची टीका केली. काही ठिकाणी बाळासाहेबांच्या नावापुढे जनाब लावल्याने देखील राज ठाकरे यांनी टीका केली. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

राज ठाकरे म्हणाले की, ‘वेगळ्या विचारांची युती आणि आघाडी होती. पण सर्वात लाजीरवाणी गोष्ट उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानंतर बाळासाहेबांच्या पुढचं हिंदुहृदयसम्राट काढून टाकलं. काही ठिकाणी तर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलेलं मी पाहिलं. स्वत:च्या स्वार्थासाठी इतक्या खालपर्यंत गेले तुम्ही. सभापतींना तेव्हा सांगितलं होतं बाळासाहेबांचं एक चित्र विधानभवन आणि विधानपरिषदेच्या सभागृहात लावा. त्यांना कळेल आपण इथपर्यंत कोणामुळे आलो. हे इकडे बघत होते तिकडे ४० निघून गेले. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही आपले ४० आमदार गेले. हे आमदार घेऊन जाणारे एकनाथ शिंदे म्हणाले होते, काँग्रेस आणि अजित पवार यांच्यासोबत बसणं म्हणजे श्वास घेता येईना. पण नंतर अचानक कळलं मांडीवर अजित पवार येऊन बसले. कोणतं राजकारण सुरु आहे. काय चालुये. महाराष्ट्राचं भविष्य हे आहे का?’

‘शेतकरी आत्महत्या करतोय. यांची मात्र मज्जा सुरु आहे. हे माणसं असे का वागतात कारण तुम्ही चिडत नाहीत. याच लोकांना पुन्हा मतदान करतात म्हणून तुम्हाला गृहीत धरले आहे. कसेही वागले तरी चालेल. परत रांगेत उभे राहतील आणि आम्हालाच मतदान करतील. ही समज तुम्ही मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्र ठिकाण्यावर येणार नाही. असा महाराष्ट्र कधी नव्हता.’

‘गद्दारी करणारे आधी मान खाली घालून जायचे. आता मात्र त्यांना काहीच वाटत नाही. मतांचा अपमान करुन देखील तुम्ही शांत बसत असेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला. शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरु केले. आता तर पक्ष आणि चिन्हच ताब्यात घ्यायचं. असं कधी पाहिलं नव्हतं. शिंदे आणि पवारांनी नाव आणि चिन्ह घेतलं. शिवसेना नाव हे उद्धव ठाकरे किंवा शिंदेची प्रॉपर्टी नाही. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माणसं पळवली जाताय.’ असं ही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.