AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अन् राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी, मेळाव्यात नेमकं काय विसरले?

आज मुंबईमध्ये मराठी माणसांचा विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती होती. यावेळी मराठीच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

...अन् राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी, मेळाव्यात नेमकं काय विसरले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2025 | 3:53 PM
Share

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची होती. मनसेनं या विरोधात रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली. अखेर सरकारने काही दिवसांपूर्वी त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द  केला, त्यानंतर आज मुंबईमध्ये मराठी माणसाचा विजय मेळावा पार पडला.

या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं? या मेळाव्यातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. मात्र या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

‘हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो. राज ठाकरे ।’ असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज्य भरात कायकर्त्यांचा जल्लोष 

आज मुंबईमध्ये मराठी माणसाचा विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची असलेली ही इच्छा या निमित्तानं पूर्ण झाली. त्यामुळे आज राज्यातील अनेक ठिकाणी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क.
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद.