AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अन् राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी, मेळाव्यात नेमकं काय विसरले?

आज मुंबईमध्ये मराठी माणसांचा विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती होती. यावेळी मराठीच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

...अन् राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी, मेळाव्यात नेमकं काय विसरले?
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Jul 05, 2025 | 3:53 PM
Share

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची होती. मनसेनं या विरोधात रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली. अखेर सरकारने काही दिवसांपूर्वी त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द  केला, त्यानंतर आज मुंबईमध्ये मराठी माणसाचा विजय मेळावा पार पडला.

या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं? या मेळाव्यातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. मात्र या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

‘हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो. राज ठाकरे ।’ असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज्य भरात कायकर्त्यांचा जल्लोष 

आज मुंबईमध्ये मराठी माणसाचा विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची असलेली ही इच्छा या निमित्तानं पूर्ण झाली. त्यामुळे आज राज्यातील अनेक ठिकाणी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.

त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या
त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या.
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल.
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा.
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री.
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं.
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्.
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?.
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?.
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या.
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं.