Raj Thackeray : पदाची जबाबदारी घेता, मग अपयशाची जबाबदारीही स्वीकारा – राज ठाकरे कडाडले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शांततामय आंदोलनाचे दमन आणि विद्यार्थ्यांवरील अत्याचार हे निंदनीय असून, सरकारने आपल्या अपयशाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. सत्तेचा उद्दामपणा सोडून विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. कशा प्रकारे चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे दिसतंय. शांततामय रित्या आंदोलन सुरू होतं. मुलांवर केंद्रातून दबाव आणला जात आहे, त्यांना मारलं जात आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या पदाची जबाबदारी घेता, तेव्हा त्या पदापासून आलेल्या अपयशाची देखील जबाबदारीही तुम्हीच घेतली पाहिजे, असं महणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे यांच्यांसोबत घेतलेल्या संयुक्त पतर्कार परिशदेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. सरकारवर टीका करतााना त्यांनी अनेक दाखले दिले.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथील निवासस्थानी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राज व उद्धव यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
काय म्हणाले राज ठाकरे ?
गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. कशा प्रकारे चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे दिसतंय. शांततामय रित्या आंदोलन सुरू होतं. मुलांवर केंद्रातून दबाव आणला जात आहे, त्यांना मारलं जात आहे. त्याचे परिणाम देशात उमटत आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत उमटत आहेत. ही साधी गोष्ट होती. या प्रकरणात भाजप जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. रजा अकादमी विरोधात आम्ही अरुप पटनायक आणि पोलीस आयुक्तांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा त्यांना बाजूला केलं होतं असं उदाहरण राज ठाकरेंनी सांगितलं.
तेव्हा आर.आर. पाटील यांचा राजीनामा घेतला…
मुंबईवरील हल्ल्यानंतर बडे बडे शहरो में ऐसी घटना होती है असं आर आर पाटील म्हणाले होते, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला गेला. त्यामुळे या प्रकरणात तुम्हीच जबाबदारी घेतली पाहिजे. पदाची जबाबदारी घेता, मग अपयशाची जबाबदारीही घ्या, हीच मागणी मुलांची आहे, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं.
तिसऱ्यांदा पेपर फुटले होते. आम्ही केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेऊ नका म्हटलं होतं. पण त्यावेळी सत्तेमुळे त्यांची ऐकण्याची तयारी नव्हती. आजही नाही. प्रधानांच्या राजीनाम्यापुरती गोष्ट मर्यादित राहिली नाही. ती पंतप्रधान आणि गृहखात्यांपर्यंत गेली. मोदींनी आज ट्विट केलं. त्याला काही अर्थ नाही. या मुलांना बोलवून चर्चा केली असती. प्रकरण समजून घेतलं असतं तर एवढं प्रकरण झालं नसतं. सत्तेचा उद्दामपणा कशासाठी आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.