राज यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र, ते कोणाची ‘बी’ टीम म्हणून काम करणार नाहीत; चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण

| Updated on: Apr 13, 2022 | 12:29 PM

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेला इको सिस्टीमने भाजपची 'बी' टीम ठरवण्याचा प्रयत्न झाला. जितेंद्र आव्हाड, अजितदादा नंतर आता आदित्य ठाकरे यात सामील झालेत. मात्र, राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे. ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत.

राज यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र, ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत; चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण
चंद्रकांत पाटील
Image Credit source: twitter
Follow us on

कोल्हापूरः राज यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे. ते कोणाची ‘बी’ टीम म्हणून काम करणारे नाहीत, अशी पाठराखण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी करत राज यांचा बुधवारी कैवार घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थावरील सभेनंतर काल ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत अनेकांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरून अनेकांनी त्यांच्यावर पलटवार केला. संजय राऊत यांनी आज सकाळीच मुंबईत एक जळजळीत पत्रकार परिषद घेऊन राज कोणाचा भोंगा वाजवतायत हे कळून चुकल्याचे सांगितले. त्यानंतर आता राज यांना भाजपकडून जोरदार बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

जनाब म्हणूनही सरकारमध्येच…

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेला इको सिस्टीमने भाजपची ‘बी’ टीम ठरवण्याचा प्रयत्न झाला. जितेंद्र आव्हाड, अजितदादा नंतर आता आदित्य ठाकरे यात सामील झालेत. मात्र, राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे. ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंना कोणी जनाब म्हणते आहे, असे असताना सुद्धा तुम्ही सरकार मध्येच आहेत.

आता मशिद पाडल्याचे श्रेय…

चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्व हा भाजपचा श्वास आहे. अलीकडे काहीजण अयोध्या मशिद पडल्याचे श्रेय घेत आहेत. आज हिंदुत्वाचा जो मुदा राज ठाकरे मांडत आहेत, तो आम्ही आदीपासून मांडला आहे. मेहबुबा मुफ्ती ना एका लाइनवरून आणण्यासाठी भाजप सोबत गेली, पण त्या योग्य लाइनवर येत नाहीत असे दिसल्यावर भाजप बाहेर पडली.

सत्तेचा दुरुपयोग सुरू…

राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या सभेदरम्यान तलवार दाखवली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकार गुन्हा दाखल करण्याची एक ही संधी सोडत नाही, पण न्यायालयात गेल्यावर ते तोंडावर पडतात. सत्तेत असल्याचा दुरुपयोग करून हे सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!