AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajyasabha Election : संभाजीराजेंच्या खासदारकीचं ठरलं? उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे, “वर्षा” भेटीनंतर विनायक राऊतांकडून सूचक विधान

साहजिकच ही भेट आणि राज्यसभेची निवडणूक याबाबत चर्चा तर होणारच, आता या भेटीनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरील भेटीनंतर खासदारकीचं पक्कं झालंय का? असा सवाल सध्या राजकारणात विचारण्यात येतोय.

Rajyasabha Election : संभाजीराजेंच्या खासदारकीचं ठरलं? उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे, वर्षा भेटीनंतर विनायक राऊतांकडून सूचक विधान
संभाजीराजेंच्या खासदारकीचं ठरलं? उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे, "वर्षा" भेटीनंतर विनायक राऊतांकडून सूचक विधानImage Credit source: tv9
| Updated on: May 19, 2022 | 7:59 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकांचे (Rajyasabha Election) वारे वाहत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यातून 6 जागा या राज्यसभेवरून नवडून दिल्या जाणार आहेत. त्यात 2 भाजप, 1 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी काँग्रेस, तर 1 शिवसेना असे सध्याचे गणित आहे. तर संभाजीराजे छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) यांनी अपक्ष लढण्याची हाक दिल्याने सहाव्या जागेच गणित अजूनही फिक्स नाही. मात्र अशातच राज्यात मोठ्या हलचालींनी वेग आलाय. आजच संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या वर्षा या निवास्थानी दाखल होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. साहजिकच ही भेट आणि राज्यसभेची निवडणूक याबाबत चर्चा तर होणारच, आता या भेटीनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरील भेटीनंतर खासदारकीचं पक्कं झालंय का? असा सवाल सध्या राजकारणात विचारण्यात येतोय.

विनायक राऊत काय म्हणाले?

नितेश राणेंच्या वायफळ बडबडीला आम्ही काडीची किंमत देत नाही.स्वार्थासाठी राजकारण करणार राणे घराणं आहे. संभाजी राजेंनी जर उमेदवारीसाठी आपली इच्छा व्यक्त केली तर त्यात नाक मुरडण्यासारखं काय आहे? संभाजी राजे खासदार होऊ नये या इच्छेने काहीजण पछाडले आहेत. त्यांच्यामध्ये त्यांचा अंतर्भाव आहे. मात्र संभाजी राजेंविषयी निर्णय उद्धव ठाकरेंच घेऊ शकतात.आज ते त्यांना भेटायला गेले होते,उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे आहेत, त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, असे सूचक विधान विनायक राऊत यांनी केलं आहे.

राज ठाकरेंना अयोध्येला जायचा अधिकार नाही

विनायक राऊत एवढंच बोलून थांबले नाहीत तर यावेळी त्यांनी मनसेवरही जोरदार हल्लाबोल चढवला आहे. एका महिला कॉन्स्टेबलला धक्का मारून पाडायचं आणि पळून जायचं ही निंदाजनक गोष्ट होती. हा पळपुटेपणा मनसेच्या लोकांनी सुरू केला होता त्याला न्यायालयाने जामीन दिला असेल तर मला काही बोलायचं नाही आहे. मनसेला जनाची नाहीतर मनाची लाज असेल तर अशा देशपांडेची हकालपट्टी करायला हवी, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. तर राज ठाकरेंना अयोध्येत जाण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे.उद्धव ठाकरे अयोध्येत जात होते तेव्हा व्यंगचित्रातून विटंबना करणारे राज ठाकरे होते. केवळ राजकारणासाठी नौटंकी करण्यासाठी ते अयोध्येला जात असतील. शिवसेनेने ही अशी आंदोलने केली पण अस घाणेरडं राजकारण केलं नाही.आम्ही आंदोलन करताना त्यांना नग्न करून मारपीट करावी, त्यांची प्रॉपर्टी हडप करावी हा धंदा शिवसेनेने कधीच केला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Follow Us
नाशिकच्या सातपुरातील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुरातील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.