AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास आठवले यांच्या भाजपकडे 3 मोठ्या मागण्या, अन्यथा रिपाई मोठा निर्णय घेणार?

रामदास आठवले यांनी भाजपकडे 3 मोठ्या मागण्या केल्या आहेत. त्यावर भाजप काय प्रतिसाद देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी काळात लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसेच लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे. या सर्व घडामोडी पाहता रामदास आठवले यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

रामदास आठवले यांच्या भाजपकडे 3 मोठ्या मागण्या, अन्यथा रिपाई मोठा निर्णय घेणार?
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 06, 2023 | 5:41 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. देशात पुढच्यावर्षी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी लगेच राज्यातील विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षाला 3 जागा हव्या आहेत. तर विधानसभेसाठी रामदार आठवले यांनी 15 जागा मागितल्या आहेत.

रामदास आठवले यांनी आणखी एक मोठी मागणी केली आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाई पक्षाला एक जागा मिळावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांच्या या मागणीवर भाजप काय निर्णय घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. भाजपने रामदास आठवले यांची मागणी पूर्ण केली नाही तर ते युतीतून बाहेर पडतील का? की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठवले यांची समजूत काढण्यास यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

“केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आमच्या पक्षाला केंद्रीय मान्यता आणि चिन्हाला मान्यता मिळवायची असेल तर 2 जागांवर तरी निवडून यायला पाहिजे. यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून दोन ते तीन जागा मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला दहा ते पंधरा जागा मिळाव्यात. त्यामुळे तितक्या जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहील”, असं आठवले यांनी सांगितलं.

‘राज्यात रिपाईला एक मंत्रिपद मिळावं’

“महाराष्ट्र सरकार चांगले निर्णय घेत आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात आरपीआयला संधी मिळावी अशी मागणी आम्ही देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. त्यांनी त्यावर विचार करू, असं सांगितलंय. महामंडळात देखील पक्षाला संधी मिळाली पाहिजे. राज्यातील महायुती सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळे 2024 मध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही युतीसोबतच असणार आहोत. आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या पाहिजेत”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

राज्याला लवकरच 14 मंत्री मिळणार?

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे या विस्तारात फक्त 14 जणांना संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 7 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. तर उर्वरित विस्तार हा ओक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.