AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊत काय स्वातंत्र्य लढा लढून जेलमध्ये गेले नव्हते’, रावसाहेब दानवेंनी पुस्तकावरून डिवचलं

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. संजय राऊत यांच्या या पुस्तकावर राजकीय वर्तुळातुन विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राऊत यांच्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना हल्लाबोल केला आहे.  

'संजय राऊत काय स्वातंत्र्य लढा लढून जेलमध्ये गेले नव्हते', रावसाहेब दानवेंनी पुस्तकावरून डिवचलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 18, 2025 | 6:14 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. संजय राऊत यांच्या या पुस्तकावर राजकीय वर्तुळातुन विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राऊत यांच्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे? 

एखादं पुस्तक लिहिणं आणि त्या पुस्तकांमध्ये आपला जीवन परिचय, राजकीय जीवनात आणि आयुष्यात कोणत्या संकटांना तोंड दिलं, एवढ्या संकटाला तोंड देऊन मी इथपर्यंत कसा पोहोचलो. जे काही महान नेत्यांनी पुस्तक लिहिलेले आहेत त्यामध्ये हे नमूद असतं. परंतु एखादं पुस्तक केवळ आणि केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी लिहायचं असेल, तर त्या पुस्तकाला पुस्तक म्हणता येणार नाही. असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांची भाषा, त्यांची बोली आणि त्यांचे हावभाव रोज सकाळी नऊ वाजता महाराष्ट्रातील जनता पाहाते. कधीतरी परमेश्वरांनी त्यांना बुद्धी दिली नाही की आपण चांगलं बोलावं म्हणून. त्यामुळे त्यांनी त्यांचे जे काही अनुभव या पुस्तकात सांगितलेले आहेत, ते काही स्वातंत्र्य लढा लढून आलेले आणि जेलमध्ये नव्हते गेले. ते कोणत्या कारणामुळे जेलमध्ये गेले होते हे त्यांनी रोखठोकमध्ये लिहावं, त्यांनी जर असं म्हटलं असतं की मी देश सेवा करताना आणि महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करताना जेलमध्ये गेलो, आणि मला असे अनुभव आले तर ती गोष्ट आम्ही मान्य केली असती, असा खोचक टोलाही यावेळी रावसाहेब दानवे यांनी राऊत यांना लगावला आहे.

 उद्धव ठाकरेंना टोला 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील पुन्हा एकदा डिवचलं आहे, 2019 च्या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असं म्हणून युतीनं लोकांना मतं मागितले, त्यानंतर लोकांनी आम्हाला भरभरून मत दिले,  असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक युती केली, भाजपची साथ सोडून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली असं दानवे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....