AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार’, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा शिंदे-फडणवीसांना मोठा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला मोठा इशारा दिलाय.

'हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार', महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा शिंदे-फडणवीसांना मोठा इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2022 | 4:51 PM
Share

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय. “सोयाबीन-कापूस प्रश्नांचं निरसन झालं नाही तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार”, असा इशारा देत रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार नेमकी काय भूमिका घेतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्याची दखल घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे हजारो शेतकरी खरंच अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आंदोलनासाठी आले तर पोलिसांवरील ताणही वाढू शकतो. त्यामुळे राज्य सरकार काय भूमिका घेतं याकडे अनेकांचं लक्ष आहे.

“सोयाबी-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही? हा खरा आमचा सरकारला प्रश्न आहे. सोयाबीनला आणि कापसाला जो दर खासगी बाजारात मिळतो त्यापेक्षा उत्पादन खर्च आम्ही जास्त लावलाय, अशी आमची परिस्थिती आहे”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

“सरकार जाणीवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करतंय, अशी आमची भावना झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 50 टक्के सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. 18 टक्के कापूस उत्पादक शेतकरी आहेत. सरकार 68 टक्के शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम करतंय”, असा आरोप तुपकर यांनी केला.

“आमची मागणी नेमकी काय आहे? आम्ही भीक मागतोय का? आम्ही इतकंच मागतोय की आम्हाला सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान साडेआठ हजार भाव मिळावा. कापसाला प्रतिक्विंटल साडेबारा हजार रुपये भाव खासगी बाजारात मिळावा, अशी आमची मागणी आहे”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

“पीकविमा कंपन्यांनी तातडीने आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत दिली पाहिजे. रब्बी हंगामात आमचे ट्रान्सफॉर्मर जळतात ते महिना-महिना मिळत नाहीत. ते लगेच मिळाले पाहिजेत. आम्हाला रात्रीची वीज नको तर दिवसाची वीज द्या ही आमची मागणी आहे”, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली.

Follow Us
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्.
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर.
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.