AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार’, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा शिंदे-फडणवीसांना मोठा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला मोठा इशारा दिलाय.

'हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार', महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा शिंदे-फडणवीसांना मोठा इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2022 | 4:51 PM
Share

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय. “सोयाबीन-कापूस प्रश्नांचं निरसन झालं नाही तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार”, असा इशारा देत रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार नेमकी काय भूमिका घेतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्याची दखल घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे हजारो शेतकरी खरंच अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आंदोलनासाठी आले तर पोलिसांवरील ताणही वाढू शकतो. त्यामुळे राज्य सरकार काय भूमिका घेतं याकडे अनेकांचं लक्ष आहे.

“सोयाबी-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही? हा खरा आमचा सरकारला प्रश्न आहे. सोयाबीनला आणि कापसाला जो दर खासगी बाजारात मिळतो त्यापेक्षा उत्पादन खर्च आम्ही जास्त लावलाय, अशी आमची परिस्थिती आहे”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

“सरकार जाणीवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करतंय, अशी आमची भावना झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 50 टक्के सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. 18 टक्के कापूस उत्पादक शेतकरी आहेत. सरकार 68 टक्के शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम करतंय”, असा आरोप तुपकर यांनी केला.

“आमची मागणी नेमकी काय आहे? आम्ही भीक मागतोय का? आम्ही इतकंच मागतोय की आम्हाला सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान साडेआठ हजार भाव मिळावा. कापसाला प्रतिक्विंटल साडेबारा हजार रुपये भाव खासगी बाजारात मिळावा, अशी आमची मागणी आहे”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

“पीकविमा कंपन्यांनी तातडीने आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत दिली पाहिजे. रब्बी हंगामात आमचे ट्रान्सफॉर्मर जळतात ते महिना-महिना मिळत नाहीत. ते लगेच मिळाले पाहिजेत. आम्हाला रात्रीची वीज नको तर दिवसाची वीज द्या ही आमची मागणी आहे”, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.