AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्याप्रकरण ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, इम्तियाज जलील पहिल्यांदाच बोलले, केली मोठी मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरण ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, इम्तियाज जलील पहिल्यांदाच बोलले, केली मोठी मागणी
| Updated on: Jan 19, 2025 | 7:11 PM
Share

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर आता पहिल्यांदाच एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांचा मृत्यू झाला ते तर आता परत येणार नाहीत, आपल्याला त्यांना न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले इम्तियाज जलील? 

ज्यांचा मृत्यू झाला ते तर आता परत येणार नाहीत, आपल्याला त्यांना न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा  आणि लवकरात लवकर जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्या. महाराष्ट्रासमोर हे एक उदाहरण ठेवा, जर पुन्हा कोणी असं केलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही.  आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बीडचं पालकमंत्रिपद यावेळी धनंजय मुंडे यांना न देता अजित पवार यांना देण्यात आलं आहे. यावर देखील जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  पॉलिटिकली खूप चांगला गेम त्यांनी खेळला आहे, अजित पवार यांना माहित आहे की पुण्याचंही पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे आणि आता बीडचंही. याचा अर्थ आहे की फक्त कागदावरच ते पालकमंत्री असणार आहेत, आणि प्रत्यक्षात बीडचा पालकमंत्री म्हणून दुसरंच कोणीतरी काम करेल असं जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यावर देखील जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व लोकांना माहीत आहे, की महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी बीडमध्ये होत आहे. कशाप्रकारे तिथे गँग ऑपरेट होते, वाळू माफी असेल अजून एखादी माफी असेल, प्रश्न हा उपस्थित होतो की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न का पडत नाही? जी गुन्हेगारी सुरू आहे, त्याला कुठेतरी सरकारचं संरक्षण असल्याचं दिसतं असा टोला यावेळी जलील यांनी लगावला आहे.

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.