
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. मुंबईहून बारामतीला जात असतान त्यांच्या विमानाचा अपघात झाला. बारामती विमानतळाजवळ हा अपघात घडला. या घटमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली. अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करत हा अपघात आहे की घात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. मात्र, मुंबईत गुन्हा दाखल न झाल्यामुळे ते बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यचा पत्रकार परिषदेच त्यांनी कबुतरे चोरीला जातात त्याचा एफआयआर होतो, मग अजितदादांचा का होत नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
“दादांचा एफआयआर होत नाही’
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “एफआयर व्हावा हे माझं, युगेंद्रचं स्टेटमेंट आहे. सर्वांचं स्टेटमेंट आहे. आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही. आम्हाला राजकारण करायचं नाही. राजकारण करायचं असतं तर केलं असतं. या पत्रावर सह्या आहेत. याचं कारण आमच्या काकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा एफआयआर घेण्यात यावा या मागणीसाठी आम्ही सह्या केल्या आहे. आम्ही चार चार पुस्तके वाचली. वकिलांनी सांगितलं तरी एफआयआर दाखल करून घेतला जात नाही. अजितदादा जर तुमचे मित्र होते तर त्यांचा एफआयआर का घेतला जात नाही. उद्या आम्हाला काय झालं तर त्याचं काय होणार. जनतेचं काय होणार. काल उरळी कांचनला १६० कबुतरे चोरीला गेले. त्याचा एफआयआर झाला. पण दादांचा एफआयआर होत नाही. हा कसला नाय. एफआयआर होत नसेल तर यात काळंबेरं नाही का.”
पुढे ते म्हणाले की, “मी एवढेच म्हणेल कुणाचा तरी दबाव आहे. जेव्हा अंत्यविधी झाला होता तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आताही आम्ही सांगताना ते भावूक झाले. पण त्यांचा पेन एफआयआरवर वळत नाही. याचा अर्थ त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. सत्तेतील लोकांना ते नको असेल.”