AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता नेत्यांना गावात राहण्यासही बंदी?; मनोज जरांगे पाटील यांचा नेमका इशारा काय?

एकी वाढवा. उद्रेक करू नका. शांततेचं ब्रह्मास्त्र मोठं आहे. डेंजर आहे. 70 वर्षात जे दिलं नव्हतं ते आता द्यायला लागले. त्यांचं दिल्ली-मुंबई सुरू आहे. मीही त्यांना भेटत नाही. त्यांना वाटतं मी फुटेल. आपल्याकडे बॅगा चालत नाही. पदं चालत नाही. माझ्याकडे काहीच नाही. आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. गावागावात जागे राहा. 1 डिसेंबर नंतर मराठवाड्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण झालं पाहिजे. एकही गाव तसं राहता कामा नये.

आता नेत्यांना गावात राहण्यासही बंदी?; मनोज जरांगे पाटील यांचा नेमका इशारा काय?
| Updated on: Nov 12, 2023 | 1:40 PM
Share

जालना | 12 नोव्हेंबर 2023 : भोकरदन तालुक्यात मराठा समाजाचं बोर्ड तोडण्यात आल्याने मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. बोर्ड तोडणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. तसेच कारवाई न केल्यास आम्हाला काय करायचं ते बघून घेऊ, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. आता गावात राहण्यास बंदीही केली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेतच मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत.

संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील जालन्यातील चित्तेगाव येथे आले होते. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी गाडीच्या टपावर उभं राहूनच लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला एकजूटीचं आवाहन केलं.

24 तारखेपर्यंत आपली कसोटी आहे. झोपू नका, जागृत राहा. एकजूट कायम ठेवा. 24 तारखेपर्यंत ज्यांना गावात यायचं येऊ द्या. त्यांना गावात हिंडू फिरू द्या. पण त्यांचा पाहुणचार करू नका. खाऊपिऊ घालू नका. 24 तारखेनंतर आपण निर्णय घेऊ. त्यानंतर त्यांनी दुसरीकडे खोल्या करून राहावं लागेल. गावात राहायचं असेल तर मग आम्हाला आरक्षण द्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

गाव मराठ्यांचं आहे, येऊनच दाखव

यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांवर नाव न घेता जोरदार टीका केली. त्यांच्या मुलांना आपण सुधरवलं. आता आपल्या सुधरावा. त्यांची मुलं आता आपल्यावरच दांडकं घेऊन येत आहेत. गावात बोर्ड लावल्यामुळे ते म्हणतात, बोर्ड कशाला लावला? गाव काय तुमच्या बापाचं आहे का? असा सवाल करतानाच भोकरदनमध्ये कुणी तरी बोर्ड तोडलं. आता सुरुवात तुम्ही केली. आता बोर्डाला हात लावूनच दाखवा. हे गाव मराठ्याचं आहे. आता गावात येऊनच दाखवा, असा इशाराच त्यांनी दिला. तुला गावात यायचं तर आरक्षण घेऊन ये. आम्ही तुझी मिरवणूक काढू, असंही ते म्हणाले.

तुमची चड्डीही राहणार नाही

24 तारखेपर्यंत आपण नेत्यांची गावात प्रवेश करण्यास मज्जाव करणारी बंदी उठवली आहे. गावात यायचं तर या. पण बोर्डाला हात लावायचा नाही. आम्ही आमच्या लेकरांसाठी बोर्ड लावला. आमच्या पोरांना आरक्षण देण्यासाठी बोर्ड लावलाय. तुला गाडी, बंगले, दिले. आमदार, खासदार केलं. मंत्री केलं. तूच आमचे बोर्ड फाडतोस? मराठे बोर्ड फाडायला लागले तर तुमची चड्डीही राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

हे आहे तरी किती?

भोकरदनला जो प्रकार झाला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारला इथूनच सांगतो, आरोपींना अटक करा. त्यांच्यावर कारवाई करा. नाही तर यापुढे बोर्ड फोडले तर मग आम्ही बघून घेऊ. हे आहे तरी किती? हे अल्पसंख्याक आहेत. आमच्या नादी लागू नका. आमच्या गोरगरिबांचा प्रश्न आहे, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.