AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आम्ही जी जानसे…”, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल संजय राऊतांकडून पुन्हा सूचक विधान

संजय राऊत यांनी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संभाव्य युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विधानानंतर, राऊत यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी कोणत्याही अटी-शर्ती नसल्याचे स्पष्ट केले आणि भाजप विरोध ही जनभावना असल्याचे सांगितले.

आम्ही जी जानसे..., ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल संजय राऊतांकडून पुन्हा सूचक विधान
Sanjay Raut raj thackeray uddhav thackeray
| Updated on: Apr 20, 2025 | 11:15 AM
Share

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये जर महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल कौटुंबिक भांडणासारख्या क्षुल्लक गोष्टी मी विसरुन जाईन असे म्हटले होते. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरु झाली. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत, असा पुर्नच्चार संजय राऊतांनी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे-ठाकरे गटाच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे त्यांचे मत मांडले. “जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत, ते ठाकरे आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावर जर त्यांची सहमती होते, तर त्यात फार वादविवाद करणं योग्य नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

“काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात. त्यामुळे हे असे काटे मारत असतात. राज ठाकरेंनी एक विषय मांडला. तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा. त्यावर काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिसाद दिला. तो प्रतिसादही महाराष्ट्राच्या हितासाठी होता. यामध्ये अटीशर्थी कुठे आल्या. कोणती अट, कोणती शर्त. जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत, ते ठाकरे आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावर जर त्यांची सहमती होते, तर त्यात फार वादविवाद करणं योग्य नाही. यामताचा माझ्यासारखा माणूसही आहे. त्यात अट आणि शर्त आहे कुठे, कोणतीच नाही. एकही अट-शर्त कोणीही टाकलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी… प्रश्न इतकाच आहे की या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसत नाही. ही अट नाही लोकभावना आहे. याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचे आहे आणि विशेषत: महाराष्ट्राच्या भावनेचा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले.

“महाराष्ट्र हिताला प्राधान्य द्या”

“माझ्यासारख्या माणसाने गेले अनेक वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केले आहे. राज ठाकरेंसोबत काम केलं. श्रीकांत ठाकरेंसोबत काम केलेला माणूस आहे. राज आणि उद्धव ठाकरेंसोबत एकत्र काम केलेले आहे. आता मी आदित्य ठाकरेंसोबत एकत्र काम करतोय. महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय आहे. मराठी माणसांचा स्वाभिमान, ज्या एका उच्च ध्येयासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. ते ध्येय काय होतं. महाराष्ट्र आणि मराठी माणूस, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं ही त्यांची भूमिका होती. आता जर मतभेद वाद हे दूर ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून जर या संदर्भात काम करणारी लोकं एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत केलेले आहे. यात उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट आणि शर्थ टाकलेली नाही. महाराष्ट्रात हिताला प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नका, यात कोणती अट आणि शर्थ आहे”, असा सवाल संजय राऊतांनी केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.