AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुका आल्या की कोणता मुद्दा समोर येतो, संजय राऊत यांनी शंका घेत स्पष्टचं सांगितलं…

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाच्या प्रश्नावरून राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमीवर नाराजी व्यक्त करत कर्नाटकचा बंदोबस्त काढून केंद्राची सुरक्षा का उभी केली नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुका आल्या की कोणता मुद्दा समोर येतो, संजय राऊत यांनी शंका घेत स्पष्टचं सांगितलं...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 14, 2022 | 3:11 PM
Share

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूका जवळ आल्या की भारत-पाकिस्तानचा मुद्दा सुरू होईल, गुजरातच्या निवडणुका झाल्या आणि अचानक चीनने घुसखोरी कशी काय केली ? असा सवाल उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांनी अशी शंका घेऊन भाजपवर टीका करत गंभीर आरोप केले होते. नाशिक दौऱ्यावर आलेले संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत गुजरात निवडणूक ते लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. यामध्ये भाजपवर निशाणा साधत पाकव्याप्त काश्मीरच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. काश्मीरी पंडिताची हत्या होत आहे असल्याचे देखील राऊत यांनी म्हंटले आहे. गुजरातच्या निवडणूक झाल्यात आणि अचानक चीनने घुसखोरी कशी केली ? असा सवाल उपस्थित करून संजय राऊत यांनी भाजपच्या राजकरणावर बोट ठेवलं आहे.

लोकसभा निवडणूक आली की भाजपकडून भारत-पाकिस्तानचा मुद्दा काढला जातो, आताही गुजरातच्या निवडणूका झाल्यावर चीनच्या घुसखोरीचा मुद्दा समोर आल्याची टीका राऊत यांनी केली.

याशिवाय नाशिकमधील पत्रकार परिषदेवर महाराष्ट्र कर्नस्टाक सीमा प्रश्न गुजरात विमानतळवरच सुटेल असे वाटत होते ? असा टोला लगावत राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाच्या प्रश्नावरून राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमीवर नाराजी व्यक्त करत कर्नाटकचा बंदोबस्त काढून केंद्राची सुरक्षा का उभी केली नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे.

चीन विषयी कोणीही मोठा नेता बोलत नाही. पाकिस्तानचे नाव घेतात, मात्र चीनचे नाव घेत नाही, चीनला घाबरतात, अमित शहा म्हणतात जमीन जाऊ देणार नाही मात्र जमीन याआधीच गेली आहे अशी केंद्र सरकारवर राऊत यांनी टीका केली.

Follow Us
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....