AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यायालयाला अडचण किंवा दबाव असेल तर आम्ही… ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

आमची मागणी आहे जर खरी शिवसेना कोणती हा निर्णय घ्यायला तुम्हाला अडचण असेल तर हा निर्णय जनतेला घेऊ द्या असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

न्यायालयाला अडचण किंवा दबाव असेल तर आम्ही... ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान
Image Credit source: Google
| Updated on: Feb 17, 2023 | 1:01 PM
Share

रत्नागिरी : आमच्या वकिलांनी आमची बाजू भक्कमपणे मांडली आहे. आमची बाजू सत्याची असल्यामुळे लपवाछपवी आणि खोटे पुरावे करून बाजू मांडण्याची गरज नाही. आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे जे मत आहे तेच माझं मत आहे. कशाला ही झंजट करायची निवडणुकीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत. लोकं ठरवतील शिवसेना कोणती आहे. जर न्यायालयाला किंवा निवडणूक आयोगाला निर्णय घेतांना काही अडचण असेल, दबाव असतात बाकी काय असतं. निवडणुका घेऊन आणि कौल घेणं अशावेळी हा एकच मार्ग असतो असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हंटलं आहे.

40 लोकं गेले म्हणजे पक्ष गेला असे होत नाही. विधिमंडळ पक्षातील काही लोकं बाजूला जाणं किंवा आमदार फुटणं म्हणजे शिवसेना फुटणं असे नाही. शिवसेना गावागावात, जिल्ह्यात आहे. आमदार गेले म्हणजे पक्ष गेला असे होत नाही.

आमची मागणी आहे जर खरी शिवसेना कोणती हा निर्णय घ्यायला तुम्हाला अडचण असेल तर हा निर्णय जनतेला घेऊ द्या आम्ही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहोत असेही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

चाळीस आमदार असो नाहीतर चार आमदार असूद्या पक्षांतर हे पक्षांतर असतं. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार म्हणजे होणार त्यामुळे गोंधळ असल्याने हा निकाल लांबणीवर जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

2024 मध्ये राजकीय बदल झालेला दिसेल. देशातील राज्यातील वातावरण सध्या वेगळं आहे असे देखील संजय राऊत यांनी सांगत राज्यातील सत्तासंघर्षावरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय संजय राऊत यांनी थेट न्यायालयावर भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलत असतांना थेट न्यायालयावरच बोटं ठेवलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या या भूमिकेवरुन राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ही भूमिका घेतली आहे.

सलग तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर आज न्यायालयाने मंगळवारी पुन्हा सुनावणी घेतली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. सात न्यायमूर्तीच्या खंडपीठा समोर हा निर्णय व्हावा अशी मागणी ठाकरे गटाने केली होती, मात्र आता पाच न्यायमूर्तीच्या खंडपिठासमोर हा निर्णय होणार आहे.

एकूणच मंगळवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून असतांना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट न्यायालयाच्या भूमिकेवरच बोट ठेवलं आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.