AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : काही लोक छत्रीसारखे उगवतात, पोपटासारखे बोलणाऱ्यांनी कारखाना चालवून दाखवावा, अजित पवारांचा पु्न्हा राज ठाकरेंना टोला

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होत चाललाय. किसनवीर कारखान्यात 52 हजार सभासद आहेत. याबाबत लवकरच आमदार मकरंद पाटील यांच्या सोबत बैठक घेणार आहे, असे बोलताना, जे पोपटा सारखे बोलतात त्यांनी कारखाना चालवून दाखवावा, असा टोला अजित पवारांनी लगावला.

Ajit Pawar : काही लोक छत्रीसारखे उगवतात, पोपटासारखे बोलणाऱ्यांनी कारखाना चालवून दाखवावा, अजित पवारांचा पु्न्हा राज ठाकरेंना टोला
काही लोक छत्रीसारखे उगवतात, पोपटासारखे बोलणाऱ्यांनी कारखाना चालवून दाखवावा, अजित पवारांचा पु्न्हा राज ठाकरेंना टोलाImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 08, 2022 | 8:45 PM
Share

सातारा : राज्यात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी पुन्हा आमनेसामने आले आहे. पवारांवर (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीवर राज ठाकरे सतत जतीय राजकारण वाढल्याचा आरोप करत आहेत. तर या आरोपांना अजित पवार (Ajit Pawar) यांनीही तसेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे.या जिल्यात जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करणार आहे. प्रत्येक गावाचं सहकार्य असल्या शिवाय कोणतेही विकास होऊ शकत नाहीत. स्वच्छते बाबत सातारा जिल्हा कायम पहिला राहिला. राज्याला दिशा देण्याचे काम साताऱ्याने केले. राज्यात ऊसाची खुप परिस्थिती वाईट आहे. साखर कारखाना चालवण्याचे वेड्या गबाळ्याचे काम नाही. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होत चाललाय. किसनवीर कारखान्यात 52 हजार सभासद आहेत. याबाबत लवकरच आमदार मकरंद पाटील यांच्या सोबत बैठक घेणार आहे, असे बोलताना, जे पोपटा सारखे बोलतात त्यांनी कारखाना चालवून दाखवावा, असा टोला अजित पवारांनी लगावला.

काही लोक छत्रीसारखे उगवतात

तसेच मकरंद आबांनी किसनवीर कारखान्याकडे लक्ष घातले नाही तर आमदारकी धोक्यात येईल, असेही ते म्हणाले. साखर कारखान्यामध्ये चुकीचे बोर्ड निवडून आले तर नागरिकांच्या प्रपंचाला फटका बसतो. राज्यात काही लोक जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करत आहेत त्याला सातारकरांनी बळी पडू नका. असा टोलाही त्यांनी लगावला, तसेच लोक पावसाळ्याच्या छत्री प्रमाणे उगवतात. कधी टोल बंद करा म्हणतात. तर कधी युपी बिहारच्या लोकांना हाकलून द्या, भोंगे बंद करा असे म्हणतात. पण सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला दिसला नाही का? यांना परंतु यांच्या या निर्णयामुळे तुम्ही कोणाला तरी अडचणीत आण्याचा प्रयत्न करताय. परंतु कायदा हा सर्वांना सारखा आहे. समंजस भूमिका घेवून मार्ग काढू शकतो, असेही ते म्हणाले.

राणा आणि पडळकरांनाही टोला

तसेच हनुमान चालीसा मुख्यमंत्र्यांच्या घरा समोर जावून बोलायचीये. परंतु तुम्हाला म्हणायचीये तर घरी जावून म्हणा, असा टोलाही त्यानी राणा यांना लगावाल आहे. तसेच महाराष्ट्राचं वातावरण जर बिघडलं तर कोणताही उद्योगपती महाराष्ट्रात येणार नाही. पेट्रोल डिझेलचे भाव त्यावर कोण बोलत नाही. बारामतीला एक जण उभा राहिला होता. पण बारामतीने योग्य जागा दाखवली. असे म्हणत त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीका केली आहे. राज्यात कोणीही वातावरण खराब करु नये. सातारा जिल्हयात पर्यटनासाठी 50 कोटींचा खर्च करुन तापोळा बामणोलीचे रुपडं पालटणार आहे. महाबळेश्वर मध्ये विकास कामांसाठी 100 कोटीची तरतूद करणार, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?