Ladakh Accident : 4 वर्षाच्या जुळ्या मुली, 15 दिवसांपूर्वी सुट्टीवरुन कर्तव्यावर परतले, सातारच्या विजय शिंदेना लडाखमध्ये वीरमरण

या अपघाताने देशासह महाराष्ट्रावरही सध्या शोककळी पसरली आहे. आपले जवान आपल्या रक्षणासाठी सीमेवर जिवाचं रान करुन लढत असताता. मात्र अशी एखादी घटना सर्वाच्याच मनला चटका लावून जाते. सध्या विजय यांच्या जाण्याने साताऱ्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ladakh Accident : 4 वर्षाच्या जुळ्या मुली, 15 दिवसांपूर्वी सुट्टीवरुन कर्तव्यावर परतले, सातारच्या विजय शिंदेना लडाखमध्ये वीरमरण
सातारच्या विजय शिंदेना लडाखमध्ये वीरमरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 11:50 PM

लडाख : आज लडाखमध्ये झालेल्या अपघातानं (Ladakh Accident) देशाचं कधीच न भरून निघणारं नुकसान केलंय. लडाख प्रदेशात 26 सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन (Indian Army Vehicle Accident) श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विसापूर ता. खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (Vijay Shinde) यांचा समावेश आहे. देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे विसापूरसह खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. या अपघाताने देशासह महाराष्ट्रावरही सध्या शोककळी पसरली आहे. आपले जवान आपल्या रक्षणासाठी सीमेवर जिवाचं रान करुन लढत असताता. मात्र अशी एखादी घटना सर्वाच्याच मनला चटका लावून जाते. सध्या विजय यांच्या जाण्याने साताऱ्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांची कारकिर्द

विजय सर्जेराव शिंदे हे सन 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. 24 वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले. विसापूर गावाला सैनिकी परंपरा आहे. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे लष्करात होते. तर मोठे बंधू प्रमोद शिंदे हे लष्करात पैरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत. सध्या विजय शिंदे यांचे पोस्टिंग लेह-लडाख येथे होते. लष्करात ते सुभेदार या पदावर कार्यरत होते. 26 जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास पडले. या अपघातात सात सैनिकांचा मृत्यू झाला आणि सोळा जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्याच अपघातात सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले.

रविवारी पार्थिव आणणार

विजय शिंदे यांचे पार्थिव रविवार 29 मे रोजी विसापूर ता. खटाव येथे आणले जाणार आहे. तिथेच शासकीय इतमामात त्यांच्यावर ती अंत्यसंस्कार होणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांना निरोप देण्यासाठी या परिसरातून मोठ्या प्रमाणात जनसागर लोटणार आहे.

हे सुद्धा वाचा

कोल्हापुरातील जवानही अपघातात शहीद

याच अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशांत जाधव यांचाही मृत्यू झाला आहे. शहीद प्रशांत जाधव यांचे पार्थिव उद्या खास विमानाने बेळगांव येथे आणण्यात येणार असून बसर्गेत त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रशांत यांचे लग्न जानेवारी 2020 मध्ये झाले होते . त्यांना एक वर्षाची मुलगी ही आहे, आता जाधव कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखामुळे संपूर्ण परिसरता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.