AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांनीच दिला आत्मदहनाचा इशारा, कुलगुरुंना धरले जात आहे जबाबदार

कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठातील सध्या विभागप्रमुख पदावर असलेल प्रा. जी. एस गोसावी आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीनुसार आणि सेवेतील सेवाज्येष्ठतेनुसार १ फेब्रुवारीपासून प्रा. जी. बी. कोळेकर आपली नियुक्ती होणे अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले आहे, मात्र डॉ. संजय चव्हाण यांनी आक्षेप घेतल्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांनीच दिला आत्मदहनाचा इशारा, कुलगुरुंना धरले जात आहे जबाबदार
shivaji University kolhapur
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 2:54 PM
Share

कोल्हापूरः कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठातील (Shivaji University) रसायनशास्र (Chemistry) विभागातील नियुक्तीचा (Promotion) मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखपदावरील नियुक्तीचा मुद्यामुळे हे प्रकरण आता कुलगुरूंकडे गेले आहे. या विभागातील दोन प्राध्यापकांनी विभागाच्या विभागप्रमुखपदी नियुक्ती व्हावी यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. रसायशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक जी. बी. कोळेकर यांनी याप्रकरणी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तर डॉ. संजय चव्हाण यांच्या नियुक्तीचा मुद्दाही उचलून धरण्यात आला आहे. यासाठी रिपब्लिकन पक्ष आणि कास्ट्राईब संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील नियुक्तीचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत आता कुलगुरू काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सेवेज्येष्ठतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

विद्यापीठातील सध्या विभागप्रमुख पदावर असलेल प्रा. जी. एस गोसावी आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीनुसार आणि सेवेतील सेवाज्येष्ठतेनुसार १ फेब्रुवारीपासून प्रा. जी. बी. कोळेकर आपली नियुक्ती होणे अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले आहे. सेवेज्येष्ठतेनुसार अधिविभागप्रमुख पद माझ्याकडे देण्याविषयी त्यांनी कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांना मेलही केला आहे. प्रा. जी. बी. कोळेकर यांनी कुलगुरूंना पाठवलेल्या मेल मध्ये म्हणतात की, मला जर या पदावर नियुक्त केले नाही तर माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे मला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. या माझ्या मानसिक स्थितीला आपण जबाबदार असाल असा उल्लेख करून त्यांनी कुलगुरुंना रविवारी ईमेल केला आहे.

रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनाचा इशारा

तर प्रा. डॉ. संजय चव्हाण यांच्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अधिविभागप्रमुख पदावरील नियुक्तीसाठी राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन प्रा. डॉ. संजय चव्हाण यांची नियुक्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारी रिपब्लिकन पक्षाने कुलगुरूंना दिला आहे. तर प्रा. संजय चव्हाण यांची विभागप्रमुख पदी नियुक्ती करुन राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या आदेशाचे पालन करावे अशा मागणी शिवाजी विद्यापीठाच्या कास्ट्राईब महासंघाचे अतिरिक्त महासचिव आनंदराव खामकर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

नितेश राणेंना आधी ताब्यात घ्या, सरकारी वकिलांची मागणी मान्य होणार?

VIDEO: ‘मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू, काय देव पावलाय गं…’; वाईन विक्रीविरोधात भाजप नेत्याची झिंगाट लावणी

अहो आश्चर्य!! कोट्यवधींच्या मूर्त्या चोरट्यांकडून साभार! विशेष पॅकिंगही केली, Nanded जवळच्या कंदकुर्ती गावातली घटना काय?

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.